शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:49 IST

पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर...

ठळक मुद्देसंत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त संवाद...

 नम्रता फडणीस -पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व आहे. पंढरीचा पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा चित्सूर्य आहे. चैतन्याचा प्रासादिक स्त्रोत आहे.'ज्ञानोबा-तुकोबा' ही त्या विश्वाची उर्जा आहे. सर्वांभूती भगवदभाव हा त्या विश्वाचा धर्म आहे. अखंड भजन, नामस्मरण आणि संकीर्तन ही त्या विश्वाची श्रृती आहे. तर वारकऱ्यांचा स्नेहभाव हीच स्मृती आहे. प्रेमभक्ती हेच त्याचे चैतन्य आहे. अद्वैतानुभूती हीच त्या विश्वाची चितशक्ती असून, अहंकार विरहीत कृती होऊन स्वत:ला विसरणे हीच मुक्ती आहे. ज्ञान आणि प्रेम हा श्वास आहे तर चिदानंद हा त्याचा ध्यास आहे. हे चिंतन आहे, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी साक्षात याचि देही याचि डोळा अनुभूती घेणारे संत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या (१२ जून) श्रीक्षेत्र देहूतून आणि परवा (१३ जून) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. त्यानिमित्त 'लोकमत' ने त्यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त साधलेला हा संवाद.

महाराष्ट्राच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे, त्याविषयी काय सांगाल? - पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे वारी आहे. अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर एकदा तरी वारी अनुभवायला हवी.

इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या वारीला प्रारंभ कधी झाला?- महाराष्ट्राच्या वारीची परंपरा किमान हजार वर्षांपासूनची आहे. वारीच्या दोन परंपरा आहेत. एक म्हणजे पंढरपूरची पायी परंपरा आणि दिंड्या पताकांसह पालखीची परंपरा. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनीदेखील पायी वारी केल्याचा उल्लेख आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक' , असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. संत तुकाराम महाराजदेखील वारी करायचे. त्यांच्याकडे ४२ पिढ्यांची परंपरा आहे. तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांनी या सोहळ्याला पालखीचे सुंदर स्वरूप दिले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची ही परंपरा सुरू केली. हा १६८० पासून सुरू झालेला संयुक्त पालखी सोहळा १८३५ पर्यंत कायम होता. त्यानंतर हैबतबाबा आरफळकर जे शिंदे सरकाराच्या पदरी सरदार होते. त्यांनी स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या संस्थानिकांकडून मदत मागितली. असा त्याचा इतिहास आहे.

पंढरपूरच्या वारीत पांढरी पताका फडकवली जाते, त्यामागचे कारण काय?- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुणे नगर वाचन मंदिर येथून पालखी सोहळा जाताना पाहायचे. हे वारकरी एकरूप होऊन नाचत आहेत, हे पाहून ते भारावून जायचे. वारीत सहभागी होणाºया विविध संतांच्या पालखींबद्दल त्यांनी लेखन केले. त्यात संत कबीरांच्या पालखीचाही समावेश होता. देहू संस्थानने काढलेल्या पुस्तिकेतही त्याचा उल्लेख आहे. मधल्या काळात विविध ठिकाणाहून पालख्या घेऊन येणे शक्य नसायचे. तेव्हा संत कबीर यांच्या अनुयायांनी कबीरांचे प्रतीक म्हणून हा पांढरा झेंडा त्यांनी पालखी सोहळ्यात दिला. पालखीत भगव्या पतकांबरोबर ही पांढरी पताका म्हणून फडकवली जाते.

वारीमध्ये विविध प्रतीके समाविष्ट करण्यात आली आहेत. ती का?- वारीमध्ये भजनाबरोबरच भारूड, संकीर्तन, धाव, फुगडी आहे. या वाटचालीला एक संत खेळाचे रूप दिले आहे. काही उभी रिंगण केली जातात. रिंगण म्हणजे एक वर्तुळ. जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून जीवरूप बिंदूपासून निघायचे आणि व्यापक शिवरूपाला वळसा घालून पुन्हा जीवरूप अवस्थेच्या बिंदूपाशी जायचे. त्यातून जीवनाचे रिंगण पूर्ण होते. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीdehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी