शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:49 IST

पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर...

ठळक मुद्देसंत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त संवाद...

 नम्रता फडणीस -पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व आहे. पंढरीचा पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा चित्सूर्य आहे. चैतन्याचा प्रासादिक स्त्रोत आहे.'ज्ञानोबा-तुकोबा' ही त्या विश्वाची उर्जा आहे. सर्वांभूती भगवदभाव हा त्या विश्वाचा धर्म आहे. अखंड भजन, नामस्मरण आणि संकीर्तन ही त्या विश्वाची श्रृती आहे. तर वारकऱ्यांचा स्नेहभाव हीच स्मृती आहे. प्रेमभक्ती हेच त्याचे चैतन्य आहे. अद्वैतानुभूती हीच त्या विश्वाची चितशक्ती असून, अहंकार विरहीत कृती होऊन स्वत:ला विसरणे हीच मुक्ती आहे. ज्ञान आणि प्रेम हा श्वास आहे तर चिदानंद हा त्याचा ध्यास आहे. हे चिंतन आहे, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी साक्षात याचि देही याचि डोळा अनुभूती घेणारे संत वाड्:मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या (१२ जून) श्रीक्षेत्र देहूतून आणि परवा (१३ जून) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. त्यानिमित्त 'लोकमत' ने त्यांच्याशी वारीच्या अनुपम सोहळ्यानिमित्त साधलेला हा संवाद.

महाराष्ट्राच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे, त्याविषयी काय सांगाल? - पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे वारी आहे. अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर एकदा तरी वारी अनुभवायला हवी.

इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या वारीला प्रारंभ कधी झाला?- महाराष्ट्राच्या वारीची परंपरा किमान हजार वर्षांपासूनची आहे. वारीच्या दोन परंपरा आहेत. एक म्हणजे पंढरपूरची पायी परंपरा आणि दिंड्या पताकांसह पालखीची परंपरा. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनीदेखील पायी वारी केल्याचा उल्लेख आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक' , असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. संत तुकाराम महाराजदेखील वारी करायचे. त्यांच्याकडे ४२ पिढ्यांची परंपरा आहे. तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांनी या सोहळ्याला पालखीचे सुंदर स्वरूप दिले. त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची ही परंपरा सुरू केली. हा १६८० पासून सुरू झालेला संयुक्त पालखी सोहळा १८३५ पर्यंत कायम होता. त्यानंतर हैबतबाबा आरफळकर जे शिंदे सरकाराच्या पदरी सरदार होते. त्यांनी स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यांनी वेगवेगळ्या संस्थानिकांकडून मदत मागितली. असा त्याचा इतिहास आहे.

पंढरपूरच्या वारीत पांढरी पताका फडकवली जाते, त्यामागचे कारण काय?- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुणे नगर वाचन मंदिर येथून पालखी सोहळा जाताना पाहायचे. हे वारकरी एकरूप होऊन नाचत आहेत, हे पाहून ते भारावून जायचे. वारीत सहभागी होणाºया विविध संतांच्या पालखींबद्दल त्यांनी लेखन केले. त्यात संत कबीरांच्या पालखीचाही समावेश होता. देहू संस्थानने काढलेल्या पुस्तिकेतही त्याचा उल्लेख आहे. मधल्या काळात विविध ठिकाणाहून पालख्या घेऊन येणे शक्य नसायचे. तेव्हा संत कबीर यांच्या अनुयायांनी कबीरांचे प्रतीक म्हणून हा पांढरा झेंडा त्यांनी पालखी सोहळ्यात दिला. पालखीत भगव्या पतकांबरोबर ही पांढरी पताका म्हणून फडकवली जाते.

वारीमध्ये विविध प्रतीके समाविष्ट करण्यात आली आहेत. ती का?- वारीमध्ये भजनाबरोबरच भारूड, संकीर्तन, धाव, फुगडी आहे. या वाटचालीला एक संत खेळाचे रूप दिले आहे. काही उभी रिंगण केली जातात. रिंगण म्हणजे एक वर्तुळ. जीवनाच्या कोणत्याही क्षणापासून जीवरूप बिंदूपासून निघायचे आणि व्यापक शिवरूपाला वळसा घालून पुन्हा जीवरूप अवस्थेच्या बिंदूपाशी जायचे. त्यातून जीवनाचे रिंगण पूर्ण होते. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीdehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी