शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

Palghar Mob Lynching: ...तर आधी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू आणि मग गावात शिरू; नागा साधू आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:41 IST

पालघरमध्ये जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहंतांची हत्या करणारे राक्षसच आहेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवीपालघरमधील हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहेमुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही, तर आम्ही आमची फौज घेऊन गावात शिरू

नाशिक/मुंबई - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच पालघर जिल्ह्यातील एका गावात तीन साधूंच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत. महंतांची हत्या करणारे राक्षसच आहेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, तसे न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, गावात घुसू, अशी तीव्र भावना अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज लोकमतकडे व्यक्त केली. 

अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज म्हणाले की,'पालघरमधील हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांना घेराव घालू. त्यानंतरही त्यांनी काही केलं नाही, तर आम्ही आमची फौज घेऊन गावात शिरू,'' असा इशारा त्यांनी दिला. 

'महंतांची हत्या करणारे राक्षसच म्हटले पाहिजेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. या प्रकारामुळे देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाही,'' अशा शब्दात  अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली.

चार दिवसांपूर्वी  गुजरातमध्ये अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या तिघा जणांना पालघरमधील एक गावात चोर असल्याच्या संशयावरून अडवले होते. तसेच गावातील जमावाने या सर्वांना पकडून मरेपर्यंत मारहाण केली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीLynchingलीचिंगNashikनाशिक