शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Palghar Mob Lynching: ...तर आधी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू आणि मग गावात शिरू; नागा साधू आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 18:41 IST

पालघरमध्ये जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देमहंतांची हत्या करणारे राक्षसच आहेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवीपालघरमधील हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहेमुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही, तर आम्ही आमची फौज घेऊन गावात शिरू

नाशिक/मुंबई - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच पालघर जिल्ह्यातील एका गावात तीन साधूंच्या झालेल्या हत्येमुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमावाकडून साधूंच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे साधूसंत आणि आपल्या उग्र स्वभावासाठी परिचित असलेले नागा साधू संतप्त झाले आहेत. महंतांची हत्या करणारे राक्षसच आहेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, तसे न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, गावात घुसू, अशी तीव्र भावना अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज लोकमतकडे व्यक्त केली. 

अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज म्हणाले की,'पालघरमधील हत्याकांडाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल तर त्यांना घेराव घालू. त्यानंतरही त्यांनी काही केलं नाही, तर आम्ही आमची फौज घेऊन गावात शिरू,'' असा इशारा त्यांनी दिला. 

'महंतांची हत्या करणारे राक्षसच म्हटले पाहिजेत. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. या प्रकारामुळे देशातील सर्व आखाड्यांचे महंत संतप्त झाले आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. मात्र आता महाराष्ट्रात साधू संत सुरक्षित नाही,'' अशा शब्दात  अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी नाराजी व्यक्त केली.

चार दिवसांपूर्वी  गुजरातमध्ये अंत्ययात्रेसाठी जात असलेल्या तिघा जणांना पालघरमधील एक गावात चोर असल्याच्या संशयावरून अडवले होते. तसेच गावातील जमावाने या सर्वांना पकडून मरेपर्यंत मारहाण केली होती. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीLynchingलीचिंगNashikनाशिक