शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:38 IST

देश सोडून जाताहेत की नाही, यावर पोलिसांची करडी नजर

मुंबई - पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. 

ते म्हणाले, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पाकिस्तानला परत जावे लागेल.  राज्यात किती पाकिस्तानी नागरिक आहेत याची नावांसह यादी आमच्याकडे तयार आहे. निर्धारित वेळेत ते देश सोडून गेले की नाही याची शहानिशा केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हे पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत हे बघितलेच जाईल तरीही कोणी इथे राहिला असल्याचे निदर्शनास आले तर तत्काळ कारवाई केली जाईल. 

कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशांनुसारच ही कारवाई होईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री    

बैठकीत गैरहजर उद्धवसेनेवर टीका उद्धवसेनेचा एकही नेता/ खासदार पहलगाममधील घटनेनंतर दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हता, याबद्दल फडणवीस यांनी एका प्रश्नात खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, देशावरील संकटसमयी राजकीय मतभेद बाजूला सारून सगळे एक होतात हा आपल्या देशाचा इतिहास आहे, पण त्याचे भान उद्धवसेनेला दिसत नाही, उलट त्यांचे नेते संवेदनशील विषयांवर वाटेल तसे बोलत आहेत. ‘विमानात कधी बसले नाही अशाही लोकांना आमच्या पक्षाने जम्मू-काश्मीरमधून विमानाने परत आणले, असे विधान शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले होते. त्यावर, म्हस्के यांचे विधान अयोग्यच होते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान