शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:14 IST

हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

मुंबई - पहलगाममध्ये जो काही नरसंहार झाला त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. संकटकाळी सरकारला पाठिंबा देणे म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणे असे होत नाही हे आमचे मत आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि अमित शाहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांच्या भेटीबाबत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळी राऊतांनी हे विधान केले.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही जे मत मांडले कदाचित त्यांना ते पटले असेल परंतु त्यांची एक भूमिका आहे. संकटकाळात आपण सरकारसोबत राहायला पाहिजे. परंतु हे सरकार त्या लायकीचं नाही. हे काही इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचं सरकार आहे का, नरसिंहरावाचं सरकार आहे का...हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

तसेच चून चून के मारेंगे असं गृहमंत्री म्हणतात, कसले चून चून कर मारतायेत,आमचे २७ जण मारले गेलेत. तुम्ही अजून त्या खुर्चीवर का बसलात? मला शरद पवारांनी विचारले, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत, तेव्हा मी आलो असतो तर गोंधळ झाला असता. कारण मी तोंडावर अमित शाहांचा राजीनामा मागितला असता. तुम्हाला सगळ्यांना ते परवडले नसते. सरकारसोबत राहायला हवे असं तुम्ही सगळे म्हणता परंतु मी या मताचा नाही. ज्या सरकारच्या काळात इतका नरसंहार होतो, पुलवामापासून पहलगामपर्यंत..अशा गृहमंत्र्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी उभा राहिलो असतो तर तुमची बोलचेल अवघड झाली असती असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. जर सरकारने काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर राज्यसभेत मी शाहांचा राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामा मागतील. ज्यावेळी हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील हे त्यांनाही माहिती आहे. ज्यांना या नरसिंहाचा प्रचंड तिटकारा आहे, अस्वस्थता आहे ते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करतील असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तानIndiaभारत