शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:14 IST

हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

मुंबई - पहलगाममध्ये जो काही नरसंहार झाला त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. संकटकाळी सरकारला पाठिंबा देणे म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणे असे होत नाही हे आमचे मत आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि अमित शाहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांच्या भेटीबाबत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळी राऊतांनी हे विधान केले.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही जे मत मांडले कदाचित त्यांना ते पटले असेल परंतु त्यांची एक भूमिका आहे. संकटकाळात आपण सरकारसोबत राहायला पाहिजे. परंतु हे सरकार त्या लायकीचं नाही. हे काही इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचं सरकार आहे का, नरसिंहरावाचं सरकार आहे का...हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

तसेच चून चून के मारेंगे असं गृहमंत्री म्हणतात, कसले चून चून कर मारतायेत,आमचे २७ जण मारले गेलेत. तुम्ही अजून त्या खुर्चीवर का बसलात? मला शरद पवारांनी विचारले, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत, तेव्हा मी आलो असतो तर गोंधळ झाला असता. कारण मी तोंडावर अमित शाहांचा राजीनामा मागितला असता. तुम्हाला सगळ्यांना ते परवडले नसते. सरकारसोबत राहायला हवे असं तुम्ही सगळे म्हणता परंतु मी या मताचा नाही. ज्या सरकारच्या काळात इतका नरसंहार होतो, पुलवामापासून पहलगामपर्यंत..अशा गृहमंत्र्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी उभा राहिलो असतो तर तुमची बोलचेल अवघड झाली असती असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. जर सरकारने काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर राज्यसभेत मी शाहांचा राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामा मागतील. ज्यावेळी हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील हे त्यांनाही माहिती आहे. ज्यांना या नरसिंहाचा प्रचंड तिटकारा आहे, अस्वस्थता आहे ते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करतील असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तानIndiaभारत