शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:14 IST

हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

मुंबई - पहलगाममध्ये जो काही नरसंहार झाला त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. संकटकाळी सरकारला पाठिंबा देणे म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणे असे होत नाही हे आमचे मत आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि अमित शाहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांच्या भेटीबाबत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळी राऊतांनी हे विधान केले.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही जे मत मांडले कदाचित त्यांना ते पटले असेल परंतु त्यांची एक भूमिका आहे. संकटकाळात आपण सरकारसोबत राहायला पाहिजे. परंतु हे सरकार त्या लायकीचं नाही. हे काही इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचं सरकार आहे का, नरसिंहरावाचं सरकार आहे का...हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

तसेच चून चून के मारेंगे असं गृहमंत्री म्हणतात, कसले चून चून कर मारतायेत,आमचे २७ जण मारले गेलेत. तुम्ही अजून त्या खुर्चीवर का बसलात? मला शरद पवारांनी विचारले, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत, तेव्हा मी आलो असतो तर गोंधळ झाला असता. कारण मी तोंडावर अमित शाहांचा राजीनामा मागितला असता. तुम्हाला सगळ्यांना ते परवडले नसते. सरकारसोबत राहायला हवे असं तुम्ही सगळे म्हणता परंतु मी या मताचा नाही. ज्या सरकारच्या काळात इतका नरसंहार होतो, पुलवामापासून पहलगामपर्यंत..अशा गृहमंत्र्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी उभा राहिलो असतो तर तुमची बोलचेल अवघड झाली असती असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. जर सरकारने काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर राज्यसभेत मी शाहांचा राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामा मागतील. ज्यावेळी हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील हे त्यांनाही माहिती आहे. ज्यांना या नरसिंहाचा प्रचंड तिटकारा आहे, अस्वस्थता आहे ते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करतील असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहSharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तानIndiaभारत