शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राज्यात थंडीने केले ‘पॅकअप’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:35 AM

हवामान खात्याची घोषणा : येत्या चार दिवसांत कमाल तापमान वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्याला हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने रविवारी पॅकअप म्हणजेच माघार घेतली आहे. तशी घोषणाच भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली असून, पुढील चार दिवस राज्यांत कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी ३० ते ३२ तर राज्यभरात कमाल तापमान २८ ते ३० अंश नोंदविण्यात येईल. १२ फेब्रुवारी रोजी समुद्रकिनारी कमाल तापमान ३० ते ३२ अंश, तर १३ फेब्रुवारी रोजी कोकणात कमाल तापमान ३२ ते ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलेनत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.मुंबईची हवा बिघडणारमुंबईत उबदार दिवस व सुखद रात्रीसह हवामान कोरडे राहील. हवेची गुणवत्ता मध्यम व खराब वर्गात राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून, तर किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहील.

स्कायमेट काय म्हणते?चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, सांगली आणि सोलापूर येथे येत्या २४ तासांत हलक्या पावसाचीशक्यता आहे.मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील २४ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती निर्माण होईल.विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील २४ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी हलका पाऊस होईल.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी