शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 05:40 IST

संविधान टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; पिंपरीत वंचित बहुजन आघाडीचा मेळावा

पिंपरी : भाजपाच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात समांतर सरकार चालवत आहे. हे समांतर सरकार रोखण्यासाठी काँग्रेस पाऊल टाकत नाही, त्यामुळे काँग्रेसबरोबरचा समझोता फिस्कटला असे सांगून देशाचे संविधान कायम टिकविण्यासाठी समांतर शासन उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. अशी भूमिका बहुजन वंचित आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.पिंपरीतील एच ए मैदानावर सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन झाले. यावेळी आंबेडकर बोलत होते. आमदार इम्तीयाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अशोक सोनोने, नाथन केंगार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मुस्लिम समाजाच्या व्यकतीकडे हत्यारे आढळून आली, तर त्यास दहशतवादी ठरवले जाते. अदिवासींकडे असे काही आढळून आले तर त्यांना नक्षलवादी ठरविण्यात येते. आरएसएस तसेच सनातन संस्थेच्या सदस्यांकडे हत्यारे आढळून आल्यानंतर त्याबद्दल काहीच म्हटले जात नाही. वेगवेगळे मापदंड वापरले जात आहेत.भाजपाच्याआडून आरएसएस, सनातन या संस्थां वेगळी समांतर व्यवस्था उभी करीत आहेत. राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न होत आहे. ही समांतर व्यवस्था उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने धोरण स्पष्ट करावे, असे सुचविले. भारिप बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर जाण्याबाबत काँग्रेसचा आक्षेप होता, समांतर व्यवस्थेच्या विरोधात जाण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे आम्ही वंचित घटकांना बरोबर घेऊन जाण्याची दिशा निश्चित केली.आरक्षणाने समाजात मनभेद ...एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी आरक्षणाची खिरापत वाटली जात आहे. आरक्षणाने विद्रोह शमणार नाही. आरक्षणामुळे आपापसात स्पर्धा निर्माण होऊन मनभेद होणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विशिष्ट घरण्यांची सत्ता पहावयास मिळत आहे. मराठा समाजाला सत्तेवर संधी मिळाली, असे नव्हे तर मराठी समाजातील काही कुटूंबांनी सत्ता उपभोगली आहे. लोकशाहीत कुटुंबशाही नको, नात्यागोत्याची सत्ता आता पुरे झाली. व्देषाचे राजकारण न करता, वंचित घटकाच्या विकासाचे, सर्वसमावेशक विकासाचे राजकारण होणेगरजेचे आहे.सरकारची धोरणे चुकीची...शिक्षणाचा खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे. आपल्या येथे बँकेचे कर्ज घेऊन कुटुंबीय मुलांना शिक्षण देतात. हा खर्च कुटूंबाने केला असल्याने, तो खर्च वसूल करण्याची त्यांची मानसिकता असते. कर्ज काढून शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले, अभियंता झालेले तरूण मानवतेच्यादृष्टीने विचार करीत नाही. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे मानवतेचा बळी घेणारे लुटारू तयार होत आहेत. औरंगाबादचे एमआयमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांना आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात पाहतो.वंचित बहुजन आघाडी स्थापण्यामागे केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश नाही, तर देशाच्या संविधानाचे रक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. दरम्यान मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे रूपांतर मुलभूत अधिकारांमध्ये करण्यात येईल.असा ठराव पिंपरी येथे झालेल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.कुपोषणाची आकडेवारी पुढे येत नाहीपुणे जिल्हा हा सत्तेचे माहेरघर मानला जातो. जाणता राजाचे वास्तव्य असलेला हा जिल्हा आहे. मावळ आणि आंबेगाव भागात आदिवासींचे वास्तव्य आहे. नंदूरबार, मेळघाट, गडचिरोली येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाची आकडेवारी जाहीर केली जाते. परंतू जाणता राजा असलेल्या भागातील आदिवासींच्या कुपोषणाची आकडेवारी कधी पुढे येऊ दिली जात नाही. जाणत्या राजाला कुपोषणाची जाणीव नाही. अशी टिप्पणी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, एचएची जागा लाटण्याचा राष्ट्रवादी नेत्यांचा डाव होता, त्यामुळेच ‘एचए’चे पुनरूज्जीवन अद्याप होऊ शकले नाही. असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ