शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यात ७० हजारांवर कोरोनाचे रुग्ण; दिवसभरात २,३६१ जणांना झाला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 07:03 IST

मृतांचा आकडा २,३६२ : सोमवारी ७६ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या एका बाजूला वाढतेय, तर दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही वाढत असल्याची दिलासादायक माहिती सोमवारी आरोग्य विभागाने दिली. राज्यात दिवसभरात २ हजार ३६१ कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे कोरोना (कोविड-१९) रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तर सोमवारी ७६ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या २ हजार ३६२ झाली आहे. सध्या राज्यात ३७ हजार ५३४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ७७९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ३० हजार १०८ जण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात दिवसभरात ७६ बळी गेले. त्यात मुंबईतील ४०, मीरा भार्इंदर ६, नवी मुंबई ६, वसई विरार ३, रायगड २, कल्याण डोंबिवली २, ठाणे १, नाशिक १, पुणे ८, पिंपरी चिंचवड १, औरंगाबाद मनपा ३, जालना १, बीड १ आणि नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरातील ७६ बळींपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. ७६ पैकी ३७ रुग्ण ६० व ६० हून अधिक वयोगटातील आहेत. तर ३६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ६७ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३ टक्के झाले आहे, तर मृत्यूचा दर ३.३७ टक्के आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार १३ पॉझिटिव्ह आहेत.राज्यात ३ हजार २९४ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. त्यात सोमवारी १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस