शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रब्बीच्या शंभर टक्क्यांहून अधिक पेरण्या : मराठवाडा-विदर्भात चांगले चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 20:53 IST

गहू, मका, हरभऱ्याचे होणार भरघोस उत्पादन

ठळक मुद्देगेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम 

पुणे : अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे यंदा जलसाठे तृप्त झाल्याने रब्बीची पेरा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर असून, यंदा ५७ लाख ६४ हजार हेक्टरवर (१०१ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. हरभरा, गहू, मका या पिकांचे क्षेत्र वाढल्याने भरगोस उत्पादन होईल. गेल्यावर्षी दुष्काळामुळे रब्बीची निम्म्यावर देखील पेरणी झाली नव्हती. यंदा रब्बीचा पेरा जास्त झाला आहे. नाशिक विभागामधे रब्बीचे सरासरी क्षेत्र ४.३१ लाख हेक्टर असून, ५.२८ लाख हेक्टरवर, औरंगाबादमधे ७.७२ लाख हेक्टरवरुन साडेनऊ लाख हेक्टरवर आणि लातूर विभागातील क्षेत्र ६.४७ लाख हेक्टरवरुन ७.५६ लाख हेक्टरवर वाढले आहे. नागपूर विभागामधे ४.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोकणात २९ हजार हेक्टरवर, पुणे विभाग ११.८५ लाख हेक्टर आणि कोल्हापूर विभागात ४.४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, ११ लाख ६५ हजार ८१६ हेक्टरवर, मक्याची २ लाख ६७ हजार ३५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे क्षेत्र २२ लाख ७१ हजार ३१६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. करडई, जवस, तीळ आणि सुर्यफूल या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्यात ४० हजार हेक्टरपर्यंत घट झाली आहे. ------ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम राज्यात ज्वारी हे रब्बी हंगामाचे मुख्य पीक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. यंदा देखील त्यातील सातत्य कायम राहिले. ज्वारीचे क्षेत्र गहू, मका आणि हरभरा पिकाकडे वळत असल्याचे दिसून येते. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर (७१ टक्के) पेरणी झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती