शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास

By appasaheb.patil | Updated: July 23, 2019 13:04 IST

आषाढी यात्रा सोहळा : मध्य रेल्वेच्या चौतीस विशेष गाड्यांनी पूर्ण केल्या १२६ फेºया

ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ७ ते १६ जुलै या दहा दिवसात विविध गाड्यांसह विशेष गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडल्या होत्यावारकºयाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या होत्याआषाढी एकादशीच्या सोहळ्यादिवशी म्हणजे १२ जुलै रोजी २८ हजार ५५० वारकरी व १३ जुलै रोजी ३२ हजार २८० वारकºयांनी पंढरपुरातून प्रवास केला

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ अशी आर्त विनवणी विठुरायाला करीत पंढरीतून भाविक परतू लागले आहेत.मागील दहा दिवसात रेल्वेतून १ लाख ३१ हजार ३५३ प्रवाशांनी प्रवास केला आहे़ या प्रवाशांच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाला १ कोटी २ लाख ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी पंढरीची वारी नित्यनियमाने करतात. यंदाच्या आषाढी यात्रेला राज्यासह देशातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले होते. या वर्षी सर्वदूर पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणातून भाविक पेरणीची कामे उरकून पंढरीच्या वारीला आले होते. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेऊन भाविक समाधानी झाले. येथील प्रसाद म्हणून कुंकू, बुक्का आणि चुरमुरे तसेच देवदेवतांचे फोटो तसेच तुळशीमाळा खरेदी करून भाविक परतू लागले. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ७ ते १६ जुलै या दहा दिवसात विविध गाड्यांसह विशेष गाड्या पंढरपूर रेल्वे स्थानकावरून सोडल्या होत्या़ वारकºयाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ११ तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या, अशीही माहिती हिरडे यांनी दिली.

दोन दिवसांत मिळाले ४८ लाखांचे उत्पन्न- आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केलेल्या नियोजनामुळे राज्यभरातून आलेल्या वारकºयांना सुखरूप प्रवास अनुभवता आला़ आषाढी एकादशीच्या सोहळ्यादिवशी म्हणजे १२ जुलै रोजी २८ हजार ५५० वारकरी व १३ जुलै रोजी ३२ हजार २८० वारकºयांनी पंढरपुरातून प्रवास केला़ या दोन दिवसात रेल्वेला ४८ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ 

३४ गाड्यांच्या झाल्या १२६ फेºया- पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी भारतातील विविध भागातून भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ प्रत्येक भाविकाची सोय व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने १६ रेल्वे गाड्यांचे नियोजन केले होते़ त्यात बहुतांश विशेष गाड्यांचाही देखील समावेश होता़ या ३४ गाड्यांनी १० दिवसात १२६ फेºया पूर्ण केल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़

२० तिकीट चेकर, २५ आरपीएफचे जवान- प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील २५ तिकीट चेकिंग अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ शिवाय प्रवाशांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये, सुरक्षित प्रवास घडावा, यासाठी २५ आरपीएफ जवान पंढरपूर रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले होते़ 

यंदा आषाढीसाठी मध्य रेल्वेचे सोलापूर मंडलाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ३४ गाड्यांचे नियोजन केले होेते़ या विशेष गाड्यांनी १२६ फेºया केल्या़ त्यातून रेल्वेला  १ कोटी २ लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले़ पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांस जलद, सुखकर व आरामदायी प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अहोरात्र कष्ट घेतले़.- प्रदीप हिरडेवरिष्ठ वाणिज्य प्रबंधक,सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी