शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

By ओमकार संकपाळ | Updated: July 7, 2022 21:58 IST

'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलाची हत्या केली, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही.'

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत(दि.29 जून) औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एकीकडे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या नामांतराला पाठिंबा दर्शवला आहे.

'संभाजीनगर नावाला पाठिंबा'या निर्णयाचा एमआयएमने विरोध केला असला तरी, काँग्रेसने मात्र याचे समर्थन केले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांची हत्या केली होती, त्याची इतिहासातही नोंद आहे. मुद्दा इतकाच आहे की, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दल ज्या भावना आहेत, त्याचा आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, याला काँग्रेसचा विरोध असण्याचे कारण नाही.'

जलील काय शहराचा बादशाह आहे का? दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. जलील म्हणाले होते की, औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. त्यांनी काल बैठकही घेतली, असे विचारले असता शिरसाट म्हणाले, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? कोण इम्तियाज जलील? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. किती जरी आडवे आलेना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकद आम्ही ठेवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलीलSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेना