शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

Vidhan Parishad Election 2022: "आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, समाजासाठी; महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 00:23 IST

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे.

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही भाजपानेमहाविकास आघाडीला धक्का देत, आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. विशेष म्हणजे, भाजपला राज्यसभा निवडणुकीपेक्षाही अधिक मते विधानपरिषद निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपला राज्यसभा निवडणुकीवेळी पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. तर यावेळी तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी आणि जनतेसाठी आहे, असे म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. मात्र, मी एकच गोष्ट सांगतो, की आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आणि जनतेसाठी आहे. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्हाला कुणाची मते किती फुटलेली दिसतात, हे तुमचे कयास आहेत. या ठिकाणी जी सत्यता आहे. ती केवळ आम्हालाच माहीत आहे. सर्व पक्षातल्या त्या आमदारांचे मी आभार मानतो आणि अपक्षांचेही आभार मानतो, की त्यांनी आमचे पाचही उमेदवार निवडून आणले. 

महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही -आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते मिळवली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो. की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीय. म्हणून आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मते देतील आणि तेच येथे बघायला मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले. 

पाचव्या उमेदवराकरता आमच्याकडे एकही मत नव्हते, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मते घेतली. तसेच उरलेलेल्या चारही उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मते घेतली आणि एक प्रचंड मोठा विजय येथे झाला. यावेळी, माझे सहकारी, लक्षण जगताप आणि मुक्ता टिळक येथे आल्या आणि त्यांनी या विजयाला हात भार लावला, मी त्यांचे आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले.

या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला  -आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. मला असे वाटते, की कुठे तरी या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला आहे. राज्यात जोवर लोकाभीमुख सरकार येत नाही, तोवर आमचा संघर्ष असाच सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडी