शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:25 IST

शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते.

मुंबई : सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे उद्धव ठाकरे यांनी आता चालढकल केल्यास त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इतर निर्णय ज्या वेगाने घेतली जात आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत याचे उल्लेख केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला जाणार असल्याचे सर्वांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

'देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही', असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी वर्तवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला.