शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

'...अन्यथा महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:25 IST

शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते.

मुंबई : सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे उद्धव ठाकरे यांनी आता चालढकल केल्यास त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर इतर निर्णय ज्या वेगाने घेतली जात आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

शिवसेना सत्तेत आल्यास सर्वात आधी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेने वेळोवेळी दिले होते. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत याचे उल्लेख केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वात पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला जाणार असल्याचे सर्वांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

'देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही', असं भाकित शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी वर्तवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा सुद्धा पाटील यांनी दिला.