शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

विरोधकांकडे शत्रू म्हणून पाहू नये - पवार

By admin | Updated: February 22, 2016 01:15 IST

राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी

पुणे : राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी तडजोड करू नये. राजकारणात विरोधकांकडे कधीही शत्रू म्हणून पाहू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.पुणे महानगरपालिकेतर्फे शरद पवार यांचा रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे अमृतमहोत्सवानिमित्त मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणातील सुसंस्कृतपणा महत्त्वाचा आहे. आम्ही संसदेत भांडतो; पण राष्ट्र आणि समाजहिताच्या प्रश्नावर सर्व जण एकत्र येतो. पुणे महापालिकेतही हे पाळले जात असल्याचे पाहिले आहे. राजकारणामध्ये लोकांशी बांधिलकी ठेवली पाहिजे. पुण्यातील राजकारणामध्ये नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, एस. एम. जोशी यांची भाषणे ऐकून आपण राजकारण आणि समाजकारण कसे करायचे याचा आदर्श घेतला. पुण्यातूनच राजकीय जीवनात प्रवेश केला. यश-अपयशातील प्रत्येक क्षणी शहराने मला प्रोत्साहित केले. त्यामुळे या सत्कारानिमित्त मी पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.‘देशामधील काही राज्यांत राजकीय सभ्यता पाहायला मिळत नाही. ही एक प्रकारची राजकीय असहिष्णुताच आहे. त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. पवारांचा कामातील उत्साह आजही कायम आहे. आमचे सरकार असले तरी त्यांचे मार्गदर्शन जरूर हवे आहे,’ असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राजकीय जीवनामध्ये विचारांची लढाई होते, पण सध्या वेगळी संस्कृती येऊ पाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होत असून, ही खरी राजकीय अस्पृश्यता आहे. बहुजन समाजातील एक नेता एवढा मोठा होतो, हा पुण्याचा आणि महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पवारांचा सर्वच क्षेत्रात वावर असून, ते आमच्यासाठी एका दीपस्तंभासारखे असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)