शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

विरोधकांकडे शत्रू म्हणून पाहू नये - पवार

By admin | Updated: February 22, 2016 01:15 IST

राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी

पुणे : राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी तडजोड करू नये. राजकारणात विरोधकांकडे कधीही शत्रू म्हणून पाहू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.पुणे महानगरपालिकेतर्फे शरद पवार यांचा रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे अमृतमहोत्सवानिमित्त मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणातील सुसंस्कृतपणा महत्त्वाचा आहे. आम्ही संसदेत भांडतो; पण राष्ट्र आणि समाजहिताच्या प्रश्नावर सर्व जण एकत्र येतो. पुणे महापालिकेतही हे पाळले जात असल्याचे पाहिले आहे. राजकारणामध्ये लोकांशी बांधिलकी ठेवली पाहिजे. पुण्यातील राजकारणामध्ये नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, एस. एम. जोशी यांची भाषणे ऐकून आपण राजकारण आणि समाजकारण कसे करायचे याचा आदर्श घेतला. पुण्यातूनच राजकीय जीवनात प्रवेश केला. यश-अपयशातील प्रत्येक क्षणी शहराने मला प्रोत्साहित केले. त्यामुळे या सत्कारानिमित्त मी पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.‘देशामधील काही राज्यांत राजकीय सभ्यता पाहायला मिळत नाही. ही एक प्रकारची राजकीय असहिष्णुताच आहे. त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. पवारांचा कामातील उत्साह आजही कायम आहे. आमचे सरकार असले तरी त्यांचे मार्गदर्शन जरूर हवे आहे,’ असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राजकीय जीवनामध्ये विचारांची लढाई होते, पण सध्या वेगळी संस्कृती येऊ पाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होत असून, ही खरी राजकीय अस्पृश्यता आहे. बहुजन समाजातील एक नेता एवढा मोठा होतो, हा पुण्याचा आणि महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पवारांचा सर्वच क्षेत्रात वावर असून, ते आमच्यासाठी एका दीपस्तंभासारखे असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)