शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

हक्काचे पाणी देण्याची विरोधकांची मागणी

By admin | Updated: July 31, 2015 01:10 IST

वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्या मराठवाड्याला विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करीत विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आवाज बुलंद केला.

मुंबई : वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्या मराठवाड्याला विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करीत विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आवाज बुलंद केला. मराठवाड्याच्या प्रश्नांवर सभागृहातील चर्चेला भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी सुरुवात केली. त्यांनी तसेच शिवसेनेचे अर्जून खोतकर, राष्ट्रवादीचे राजेश टोपे, काँग्रेसचे बसवराज पाटील आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल यांनी मराठवाड्यातील समस्यांचा जळजळीत प्रकाश टाकला आणि राज्याच्या विकसित भागांच्या बरोबरीने मराठवाड्याला आणायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, असे ते म्हणाले. ‘सध्याचे सरकार हे नागपूरच्या दिशेने झुकलेले दिसते, औरंगाबादचे आयआयएम नागपूरला गेले, रोजगार हमीचे आयुक्तालयही तिकडेच गेले, मराठवाड्याला काय देणार? आघाडी सरकारच्या श्वेतपत्रिकेला आम्ही काळ्या पत्रिकेने उत्तर देत मागासलेल्या भागांवरील अन्यायाचा पाढा वाचला होता. या सरकारने तेच केले तर आता आम्ही कोणती पत्रिका काढायची असा सवाल आताचे विरोधक करतील, अशी पाळी येऊ देऊ नका असा टोला शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी हाणला. मराठवाड्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची मागणी त्यांनी केली.अहमदनगर जिल्ह्णात सर्वात कमी पाऊस पडतो तरी तेथे प्रचंड ऊस होतो. हे पाणी येते कुठून, मराठवाड्याच्या पाण्यावर ते डल्ला मारतात हे प्रकार थांबवा, असे खोतकर म्हणाले. प्रशांत बंब यांनी आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये एक हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप केला आणि या प्रकरणी चौकशीची मागणी केली. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यांची लागण मराठवाड्यातही झाली असून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार त्यात झाले आहेत, असे ते म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचे समन्यायी वाटप करा, टेक्स्टाईल, आयटी पार्क उभारा, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला प्रोत्साहन द्या, एकूण अर्थसंकल्पाच्या २० टक्के तरतूद मराठवाड्यासाठी करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. (विशेष प्रतिनिधी)मराठवाड्यात एक लाख विहिरींचे पुनर्भरण करा, कृषी विद्यापीठांमधील पदे भरा, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाची अवस्था सुधारा, रस्त्यांसाठी विशेष निधी द्या, कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरा, शेततळ्यांसाठी अनुदान द्या आदी मागण्या त्यांनी आणि इतर सदस्यांनी केल्या. मराठवाड्यावरील चर्चेला राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उत्तर दिले जाणार आहे.