शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

हक्काचे पाणी देण्याची विरोधकांची मागणी

By admin | Updated: July 31, 2015 01:10 IST

वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्या मराठवाड्याला विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करीत विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आवाज बुलंद केला.

मुंबई : वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्या मराठवाड्याला विकासासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करीत विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आवाज बुलंद केला. मराठवाड्याच्या प्रश्नांवर सभागृहातील चर्चेला भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी सुरुवात केली. त्यांनी तसेच शिवसेनेचे अर्जून खोतकर, राष्ट्रवादीचे राजेश टोपे, काँग्रेसचे बसवराज पाटील आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल यांनी मराठवाड्यातील समस्यांचा जळजळीत प्रकाश टाकला आणि राज्याच्या विकसित भागांच्या बरोबरीने मराठवाड्याला आणायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, असे ते म्हणाले. ‘सध्याचे सरकार हे नागपूरच्या दिशेने झुकलेले दिसते, औरंगाबादचे आयआयएम नागपूरला गेले, रोजगार हमीचे आयुक्तालयही तिकडेच गेले, मराठवाड्याला काय देणार? आघाडी सरकारच्या श्वेतपत्रिकेला आम्ही काळ्या पत्रिकेने उत्तर देत मागासलेल्या भागांवरील अन्यायाचा पाढा वाचला होता. या सरकारने तेच केले तर आता आम्ही कोणती पत्रिका काढायची असा सवाल आताचे विरोधक करतील, अशी पाळी येऊ देऊ नका असा टोला शिवसेनेचे अर्जून खोतकर यांनी हाणला. मराठवाड्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची मागणी त्यांनी केली.अहमदनगर जिल्ह्णात सर्वात कमी पाऊस पडतो तरी तेथे प्रचंड ऊस होतो. हे पाणी येते कुठून, मराठवाड्याच्या पाण्यावर ते डल्ला मारतात हे प्रकार थांबवा, असे खोतकर म्हणाले. प्रशांत बंब यांनी आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये एक हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप केला आणि या प्रकरणी चौकशीची मागणी केली. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यांची लागण मराठवाड्यातही झाली असून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार त्यात झाले आहेत, असे ते म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचे समन्यायी वाटप करा, टेक्स्टाईल, आयटी पार्क उभारा, धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला प्रोत्साहन द्या, एकूण अर्थसंकल्पाच्या २० टक्के तरतूद मराठवाड्यासाठी करा, अशा मागण्या त्यांनी केल्या. (विशेष प्रतिनिधी)मराठवाड्यात एक लाख विहिरींचे पुनर्भरण करा, कृषी विद्यापीठांमधील पदे भरा, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाची अवस्था सुधारा, रस्त्यांसाठी विशेष निधी द्या, कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरा, शेततळ्यांसाठी अनुदान द्या आदी मागण्या त्यांनी आणि इतर सदस्यांनी केल्या. मराठवाड्यावरील चर्चेला राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उत्तर दिले जाणार आहे.