शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ज्यांच्यावर जबाबदारी, त्यांनीच फक्त बोलावे; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:45 IST

सीएए, एनआरसीवरुन वाद होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न

मुंबई : महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी सीएए, एनआरसी याविषयावर कोणतेही भाष्य करु नये. ज्यांना या विषयाची जबाबदारी दिली आहे त्यांनीच त्यावर भाष्य करावे, यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे, ती समिती ज्यांच्यावर जबाबदारी देईल त्यांनीच यावर बोलावे, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सोमवारी विधानभवनात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीतील तीन मुख्य व घटक पक्षांच्या सगळ्या आमदारांंच्या मतदारसंघातील कामे कशी होतील याकडे सगळ्या मंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. त्यावर अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांना समान न्याय द्या, कोणाचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असतील तर माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे या, पण आमदारांना वेळ द्या असे सांगितले. सीएए आणि एनआरसी या विषयावर मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना भेटले आहेत. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. त्यामुळे आता या विषयावर उठसूट कोणीही बोलू नका, असेही त्यांनी बजावले.मुख्यमंत्री म्हणाले, आता आपण एकत्र आलो आहोत, आपल्यात काही विषयांच्या बाबतीत निश्चित मतभेद आहेत आणि मतभेद असणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. पण आपण समान किमान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. त्याच्या बाहेर आपण जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण एकदिलाने काम करु, पाच वर्षे आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही हे लक्षात ठेवा. विरोधकांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा पर्दाफाश करा, आक्रमकपणे काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.विधिमंडळाचे कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी अधिवेशन काळासाठी तीनही पक्षांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. ही समिती रोज सकाळी बैठक घेईल व कामकाजाचे नियोजन करेल. या समितीत संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि दोन राज्यमंत्री सतेज पाटील व संजय बनसोडे यांचा त्यात समावेश असेल.आमदारांना दोन पासमुंबई : विधानभवनात अधिवेशन काळात सुरक्षेचा मुद्दा पोलिस विभागाने उपस्थित केला आहे. विधानभवनात होणारी अती गर्दी देखील धोकादायक आहे, त्यातून अनेकवेळा मंत्र्यांना चालणे कठीण होऊन जाते. अशावेळी आम्हाला सुरक्षा देणे अडचणीचे होते, असे पोलीस विभागाने म्हटले होते. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पासेस देण्यावर बंधणे आणण्याचा निर्णय झाल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते म्हणाले, आमदारांना दोन पास, तर मंत्र्यांना पाच पास मिळतील.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी