शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

नव्या मंत्रीमंडळात केवळ सुभाष देसाईंचं खातं कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:26 IST

शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे. 

मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप अखेर पार पडलं. या मंत्रीमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दिग्गज मंडळी पुन्हा एकदा मंत्रीपदी विराजमान झाली. मात्र यापैकी अनेक नेत्यांना आधी उपभोगलेली मंत्रीपदे मिळाली नाहीत. यामध्ये सुभाष देसाई अपवाद ठरले आहेत. 

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मंत्रीपदं देण्यात आली होती. यापैकी अनेक नेत्यांना उद्धव ठाकरेंनी डच्चू दिला आहे. यामध्ये दीपक केसरकर, दिवाकर रावते, रवींद्र वायकर, रामदास कदम या नेत्यांचा समावेश आहे. मात्र सुभाष देसाई या मंत्रीमंडळातही कायम आहेत. फडणवीस सरकारमध्ये देसाई यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म मंत्र्यालायाचा कारभार सोपविण्यात आला होता. यावेळी देखील त्यांच्याकडे हीच जबाबदारी सोपविण्यात आले आहे. यात मराठी भाषा मंत्रालयाचा भार अधिकचा देण्यात आला आहे.

शिवसेनेकडून पुन्हा संधी देण्यात आलेल्या नेत्यांची खाती बदलण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील आघाडीच्या काळात नेत्यांनी भूषवलेली मंत्रीपदं देणे टाळले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना कधीही काम न केलेलं खातं मिळालं आहे.