शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:31 IST

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डाॅ. मृदुला गर्ग, नूतन अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष डाॅ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

हणमंत पाटील/ नितीन काळेल -

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : मराठी भाषेला राजमान्यता मिळाली. आता सर्व भारतात लोकमान्यता मिळविण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची असेल. इतर काेणतीही भाषा सक्तीची नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडली. परदेशी भाषांना पायघड्या घालताना देशातील इतर भाषांना विरोध योग्य नाही. सर्व भाषांचा सन्मान झालाच पाहिजे, पण मातृभाषा अधिक सन्मानित झाली पाहिजे, हीच सरकारचीही भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डाॅ. मृदुला गर्ग, नूतन अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष डाॅ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची दिलगिरी अन् टोलेबाजी...मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचार मांडताना मोबाइलवर सतत बोलत असल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, “महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षांत बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करावी लागते. 

उमेदवारी मागे घेण्यासाठी मोबाइलवर बोलावे लागले. त्यामुळे मी माफी मागतो, पण एक गोष्ट मला आवडली. एका अध्यक्षाने दुसऱ्या अध्यक्षांकडे सूत्रे दिली. नव्या अध्यक्षांनी आनंदाने स्वीकारली. असे राजकारणात झाले, तर किती चांगले होईल. यानंतर विचारमंडपात एकच हशा पिकला.

मराठी शाळांची गळती थांबविणे ही सरकारचीच नव्हे, तर समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे. मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांतून घडणार आहेत, अशा शब्दांत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवले.  

‘साहित्य क्षेत्रात कोणीही राजकारण आणू नये’ मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातारा जिल्ह्यातच सुमारे ५० वर्षांपूर्वी आणीबाणीच्या काळात साहित्य संमेलन झाले. दुर्गा भागवत या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव झाला. विश्वास पाटील यांचे ‘पानिपत’ हे पुस्तक मी लहानपणी वाचले. 

विचारांचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे. त्याची गळचेपी होणार नाही, ते अबाधितच राहील. आम्ही कोणत्या संस्थांत हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे साहित्य क्षेत्रातही कोणी राजकारण आणू नये.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Only Compulsory in Maharashtra: CM Fadnavis at Literary Meet

Web Summary : CM Fadnavis asserted Marathi's mandatory status in Maharashtra at a literary event. He emphasized respecting all languages but prioritizing the mother tongue. He also addressed concerns about declining Marathi schools and urged against political interference in literature.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्यDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस