शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

आतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:48 IST

जिल्हा बँकांची मात्र भूमिपुत्रांना चांगली साथ

- विशेष प्रतिनिधीमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्त इशारा देऊनही राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्जवाटप करण्यासंदर्भात आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्याने आतापर्यंत राज्यातील केवळ ५० टक्केच शेतकºयांना खरीप हंगामाचे कृषीकर्ज वाटप होऊ शकले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मात्र तत्परता दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेआहे.खरीप हंगामाचे कर्जवाटप १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. मात्र, पिकांचा हंगाम लक्षात घेता बहुतांश पीकवाटप हे जुलैअखेर करणे अपेक्षित असते. आज ९ ऑगस्ट आला तरी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम पडलेली नाही.यंदा व्यापारी बँकांना ३२ हजार ५१७ कोटी रु.कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील केवळ ११ हजार १९६ कोटी रुपयांचे म्हणजे ३४.४३ टक्केच वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी ११ हजार ५७४ कोटी रुपयांचे म्हणजे ८७.२२ टक्के कर्जवाटप केले. जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी एकत्रितपणे केलेल्या कर्जवाटपाची टक्केवारी ५० आहे पण त्यात सिंहाचा वाटा हा जिल्हा बँकांचा आहे.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापारी बँकांना कर्जवाटप वाढविण्याच्या स्पष्ट सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. तसेच त्यांनी कर्जवाटपात मागे असलेल्या १४ जिल्हा बँकांची अलिकडेच बैठक घेतली.गेल्या वर्षीपेक्षा ८ लाख शेतकरी संख्या वाढलीकर्जवाटपाचे ५० टक्केच उद्दिष्ट साध्य झाले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६ हजाराने वाढली आहे. यंदा आतापर्यंत जिल्हा बँकांनी २१.३३ लाख शेतकºयांना तर व्यापारी बँकांनी ८.८७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जवाटप केले. गेल्यावर्षी आतापर्यंत २२ लाख १४ हजार शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी