शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३ टक्के उपयुक्त जलसाठा

By admin | Updated: February 14, 2016 02:32 IST

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील अन्य सहा प्रकल्पांची अवस्था तर आणखी भीषण झाली असून, त्यांचा उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. विभागातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ ७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. जायकवाडी धरणाची क्षमता २ हजार १७१ दशलक्ष घनमीटर आहे. मागील आठवड्यात जायकवाडीत ९९ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा होता. आठ दिवसांत पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन तो ७५ द.ल.घ.मी.पर्यंत खाली आला आहे. हा जलसाठा केवळ ३ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षांतील जायकवाडीत १२ फेब्रुवारीची उपयुक्त जलसाठ्याची आकडेवारी पाहिली असता २०१३ मध्ये ९५ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा होता. २०११मध्ये धरणाच्या ऊर्ध्व भागात मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडीत ५३.१५ टक्के पाणी होते. २०१२मध्ये ३१.२२ टक्के जलसाठा होता. २०१४मध्ये १९.४३ टक्के उपयुक्त पाणी होते आणि गतवर्षी २०१५मध्ये जायकवाडीत ५१४ द.ल.घ.मी. म्हणजे २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. येलदरी (जि.परभणी) प्रकल्पात ६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा (जि. यवतमाळ)मध्ये १९ टक्के, विष्णुपुरी (जि.नांदेड) धरणात २१ टक्के तर निम्न दुधना (जि. परभणी) धरणात २५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. (प्रतिनिधी)मृत साठ्यातून पाणीपुरवठा!मराठवाड्यातील सिद्धेश्वर (जि. हिंगोली), माजलगाव (बीड), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा (जि. उस्मानाबाद) आणि नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणातील उपयुक्त जलसाठा मागील आठवड्यातच संपलेला आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.