शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

केवळ ३ टक्के उपयुक्त जलसाठा

By admin | Published: February 14, 2016 2:32 AM

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा फेब्रुवारी महिन्यातच ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने पावसाळ्यापर्यंत करायचे काय़़, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यातील अन्य सहा प्रकल्पांची अवस्था तर आणखी भीषण झाली असून, त्यांचा उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. विभागातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ ७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे. जायकवाडी धरणाची क्षमता २ हजार १७१ दशलक्ष घनमीटर आहे. मागील आठवड्यात जायकवाडीत ९९ द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा होता. आठ दिवसांत पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन तो ७५ द.ल.घ.मी.पर्यंत खाली आला आहे. हा जलसाठा केवळ ३ टक्के असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील ५ वर्षांतील जायकवाडीत १२ फेब्रुवारीची उपयुक्त जलसाठ्याची आकडेवारी पाहिली असता २०१३ मध्ये ९५ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा होता. २०११मध्ये धरणाच्या ऊर्ध्व भागात मुबलक पाऊस झाल्याने जायकवाडीत ५३.१५ टक्के पाणी होते. २०१२मध्ये ३१.२२ टक्के जलसाठा होता. २०१४मध्ये १९.४३ टक्के उपयुक्त पाणी होते आणि गतवर्षी २०१५मध्ये जायकवाडीत ५१४ द.ल.घ.मी. म्हणजे २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. येलदरी (जि.परभणी) प्रकल्पात ६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा (जि. यवतमाळ)मध्ये १९ टक्के, विष्णुपुरी (जि.नांदेड) धरणात २१ टक्के तर निम्न दुधना (जि. परभणी) धरणात २५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. (प्रतिनिधी)मृत साठ्यातून पाणीपुरवठा!मराठवाड्यातील सिद्धेश्वर (जि. हिंगोली), माजलगाव (बीड), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा (जि. उस्मानाबाद) आणि नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणातील उपयुक्त जलसाठा मागील आठवड्यातच संपलेला आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना मृत साठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.