शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

कांद्याचे दर वर्षभर राहणार सामान्यांच्या आवाक्यात!

By admin | Published: May 21, 2015 2:11 AM

र्षभर कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने १० हजार टन कांदा खरेदी व वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

योगेश बिडवई - मुंबईगारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन पुरेशा उत्पादनाअभावी कांद्याच्या होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी येते. आता मात्र वर्षभर कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने १० हजार टन कांदा खरेदी व वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशवंत माल खरेदीसाठी सरकारने तब्बल ५०० कोटींची तरतूद केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालालाही चांगला भाव मिळणार आहे. कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन दर भडकताच नाफेडने खरेदी केलेला हा कांदा बाजारात आणून भाव नियंत्रणात ठेवले जातील. नाशिक जिल्ह्यात या योजनेंतर्गत कांदा खरेदीस सुरुवात झाली आहे, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली. साधारणपणे आॅक्टोबरनंतर अवेळी पावसाने कांद्याचे नुकसान होऊन पुरेशा उत्पादनाअभावी त्याचे दर वाढतात. एकीकडे शेतकऱ्यांना खराब मालाच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भाव मिळत नाही, तर दुसरीकडे ग्राहकाला मात्र अव्वाच्या सव्वा दराने कांदा खरेदी करावा लागतो. नैसर्गिक आपत्तीचे संकट लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाशवंत कृषी माल व फलोत्पादित वस्तूंची खरेदी व वितरणाचा निर्णय घेतला आहे. शेतमालाचे भाव स्थिर राहण्यासाठी सरकारने ५०० कोटींच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी’ची (प्राईस स्ट्रॅबिलायझेशन फंड) स्थापना केली. केंद्र सरकारच्या या निधीअंतर्गत लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीत शुक्रवारपासून कांदा खरेदीस सुरुवात झाली आहे. लासलगावला खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू झाली आहे. यासाठी ‘नाफेड’ नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. दोन दिवसांत ४० टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. हा कांदा नाफेडच्या साठवणूक केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. सरकारने सूचना केल्यानंतर हा कांदा बाजारात आणला जाईल. साधारणपणे चार महिने टिकेल असा उन्हाळ कांदा (रबी) नाफेडच्या माध्यमातून ६०० ते १,६०० रुपये क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. कांद्याची टंचाई निर्माण होताच हा माल बाजारात आणला जाईल. च्कांदे, बटाटे यासारखा नाशवंत कृषीमाल खरेदी करून तो साठवला जाणार आहे. ही योजना ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर कार्यरत राहील. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही योजना आहे. शेतमाल विकून नफा झाल्यास ती रक्कमही किंमत स्थिरीकरण निधीतच टाकली जाईल. च्भाव भडकताच हा माल बाजारात आणून दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे. ‘नाफेड’ची देशभर यंत्रणा असल्याने देशात कुठेही ठरावीक कृषी मालाची टंचाई निर्माण होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न असणार आहे. केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीची स्थापना करताच मी नाफेडच्या अधिकाऱ्यांना या योजनेंतर्गत कांद्याची खरेदी करता येईल, असे सुचविले. त्यानुसार लासलगावला नाफेडचे कार्यकारी संचालक, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होऊन खरेदी सुरू झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत निघेल. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेडच्२००९ मध्ये किरकोळ खरेदीचा अपवाद वगळता ‘नाफेड’च्या माध्यमातून तब्बल १० वर्षांनी कांदा खरेदी करण्यात येत आहे.