शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळतोय उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:25 IST

निर्यात बंदीनंतरही दर टिकून; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनाही मागे टाकले

ठळक मुद्देनिर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहेकांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले

अरुण बारसकर 

सोलापूर :  निर्यात बंदीनंतर राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वरचेवर वाढत आहे.  असे असले तरी दर मात्र स्थिर असल्याचे दिसत आहे. सध्या सोलापूरबाजार समितीमध्ये राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी (सर्वाधिक) दर मिळत आहे.  कांद्याचे सर्वाधिक उत्पादन व विक्री करणाºया नाशिक जिल्ह्यालाही सोलापूर बाजार समितीने दराबाबत मागे टाकले आहे.

राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणा, चांदवड, कळवण या प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी अथवा साठवणुकीच्या कांद्याची विक्री  मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती कांदा विक्रीत आघाडीवर असतात. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक व विक्री होते; मात्र त्याचे प्रमाण कमी असते तसेच सतत वर्षभर कांद्याचे लिलाव होत नाहीत. सप्टेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊ लागल्यानंतर दर वाढीला सुरुवात झाली. 

क्विंटलला ८०० ते १००० रुपये असलेला दर पाच हजारांच्या दरम्यान विक्री होऊ लागला. आवक कमी व कांद्याचे दर वरचेवर वाढू लागल्यानंतर केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी घातली. याचा परिणाम दराची घसरण होईल असे वाटत होते मात्र दर स्थिर राहिल्याचे आकडेवारीवरुन दिसून  येते. 

या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ३९०० रुपये दर मिळाला आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये क्विंटलला ४३५० रुपयांचा दर मिळाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीतही नाशिक   जिल्ह्यातील बाजार समित्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

यावर्षीचा उच्चांकी दरही सोलापुरातच..- सप्टेंबर महिन्यातील तिसºया आठवड्यात राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक  ५ हजार ३२५ रुपये, लासलगावला ५ हजार १०० रुपये, उमराणा व  पिंपळगाव बसवंत बाजार समितीत प्रत्येकी ४ हजार ८०० रुपये, कळवण बाजार समितीत ४ हजार ७६५ रुपये तर  चांदवड बाजार समितीत क्विंटलला ४ हजार ९०० रुपये दर मिळाला होता. यावर्षीचे हे उच्चांकी दर आहेत. च्आॅक्टोबरमध्ये लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटलला ३४५२ ते ३,८२५ रुपये, उमराणा बाजार समितीत ३२४० पासून ३८०० रुपये, पिंपळगाव बाजार समितीत ३४५५ ते ३८११ रुपये, कळवण बाजार समितीत ३३०० ते ३९०० रुपये  तर सोलापूर बाजार समितीत ४१५० ते ४३५० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. हे सर्वाधिक दर आहेत. 

सोलापूर बाजार समितीत शनिवारी (१२ आॅक्टोबर) १५ हजार १४३ क्विंटल कांद्याची आवक व विक्री झाली. सर्वाधिक ४,२७५ रुपयाने कांदा विकला. शुक्रवारी (११आॅक्टोबर) ९ हजार १५९ क्विंटलची विक्री झाली. सर्वाधिक  ४,३५० रुपये दर मिळाला. राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळत आहे. - श्रीशैल नरोळेउपसभापती, सोलापूर बाजार समिती 

उशिरा पाऊस झाल्याने कांद्याची लागवड मागील १५ दिवसापासून सुरू आहे. यामुळे आमच्या भागातील कांदा विक्रीसाठी येण्यास अवधी लागणार आहे. सध्या कांद्याला भाव असला तरी आमचा कांदा बाजारात येईपर्यंत दर टीकेलच असे नाही. दोन-तीन हजाराने कांदा विक्री झाला तरी शेतकºयांना परवडते.- भारत जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारNashikनाशिक