शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Vidhan Parishad Election: भाजपसाठी एकेक मत महत्वाचे! लक्ष्मण जगताप पुण्याहून अँबुलन्समधून रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 11:04 IST

Maharashtra Vidhan Parishad Election: भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे.

भाजपासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव झाली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक, आमदार अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्याचे नाकारले आहे. यामुळे भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 अशातच भाजपाचे आजारी असलेले पुणे, पिंपरी चिंचवडमधील दोन आमदार मुंबईकडे निघाले आहेत. मुक्ता टिळक या सकाळीच मुंबईकडे रवाना झाल्या. परंतू, लक्ष्मण जगताप हे अँम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही आता मतदानासाठी सुरुवात केली असून आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचे मतदान झाले आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले आहे.

शिवसेना आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेना आमदार उशिराने विधानभवनात पोहोचली आहे. दुसरी बस आताच विधानभवनात पोहोचली आहे. एका बसमध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे होते. त्यांच्या काही वेळ आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. शिवसेना आमदार उशिरा आल्याने आता त्यांना मतदानासाठी थांबावे लागणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशी ठाकरे चर्चा करणार आहेत. 

राज्यसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना लढवय्ये आमदार म्हणत त्यांना हा विजय समर्पित केला होता. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा