शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 16:48 IST

‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देया परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकालमंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून गाझियाबाद येथील मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचाच दबदबा राहिला आहे. परीक्षेच्या एकुण निकालाची टक्केवारी ८३.०१ एवढी आहे.‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ६ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एक टक्क्यांनी अधिक आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ८८.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.९९ एवढी आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९.३२ टक्क्यांनी कमी आहे. एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ७२ हजार ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.गाझियाबाद मधील स्टेप बाय स्टेप शाळेतील मेघना श्रीवास्तव हिने ९९.८ टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी वगळता तिला सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजीमध्ये तिला ९९ गुण मिळाले. गाझियाबाद येथीलच अनुष्का चंद्रा हिला मेघनापेक्षा केवळ १ गुण कमी मिळाला असून ती ९९.६ टक्के गुणांसह देशात दुसरी आली आहे. तिसºया क्रमांकावर सात जण असून त्यांना प्रत्येकी ४९७ म्हणजे ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. चाहत बोधराज, आस्था बाम्बा, तनुजा काप्री, सुप्रिया कौशिक, नकुल गुप्ता, क्षितीज आनंद व अनन्या सिंग अशी त्यांची नावे आहेत. मंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के लागला आहे. त्याखालोखाल चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्ली विभागात ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८Womenमहिलाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी