शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आॅफलाइनचे पत्र मिळणार नाही

By admin | Updated: July 26, 2016 01:15 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. याची पुरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई

मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. याची पुरेपूर कल्पना मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयांना आहे. मात्र तरीही आॅफलाइन प्रवेश हवा असेल, तर उपसंचालक कार्यालयातून पत्र आणावे, अशी दिशाभूल करणारी माहिती महाविद्यालयांतून दिली जात आहे. परिणामी, पालक आणि विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालय महाविद्यालयांना तंबी देणार असल्याचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.केवळ महाविद्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी काही महाविद्यालये खोडसाळपणा करत असल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तर काही महाविद्यालयांमधील दलालांचा आॅफलाइन प्रवेशाचा धंदा बंद झाल्याने संबंधित दलाल विद्यार्थी व पालकांमध्ये रोष निर्माण करण्यासाठी हा मार्ग वापरत आहेत, त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये किंवा चुकीचे सल्ले देऊ नयेत, असे पत्र पाठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पुन्हा गोंधळ, पुन्हा ठिय्यागुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला नव्हता, त्यांना सोमवारी आणि मंगळवारी मोबाइलवर मेसेज येणार होते. मात्र सोमवारी सकाळी मेसेज न आल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या वेळी पोलिसांच्या मदतीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी पालकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यालयाचा दरवाजाच बंद केला. उपसंचालकांची भेट होत नसल्याने शेकडो पालकांनी विद्यार्थ्यांसह कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. त्यानंतर उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी कार्यालयाबाहेर येऊन पालकांना मार्गदर्शन करत शांत केले. तोपर्यंत उपसंचालक कार्यालयाला युद्धभूमीचे रूप आले होते. (प्रतिनिधी)प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी...२५ आणि २६ जुलैला केवळ नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज येतील. मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने अर्ज करायचा आहे.ज्या विद्यार्थ्यांनी याआधी अर्ज भरलेला नाही, किंवा अर्धवट अर्ज भरलेला आहे, त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान अर्ज पूर्ण भरायचा आहे. त्यांच्यासाठी ४ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीमधील महाविद्यालयात ५ व ६ आॅगस्ट रोजी जाऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल.ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे किंवा विषय चुकीचा निवडला आहे किंवा शाखा बदल करायचा आहे किंवा प्राधान्यक्रम चुकला आहे, त्यांनी ९ आॅगस्टला नव्याने अर्ज भरावा. या विद्यार्थ्यांसाठी ९ ते १३ आॅगस्टदरम्यान पहिली, १८ ते २३ आॅगस्टदरम्यान दुसरी आणि २५ ते ३० आॅगस्टदरम्यान तिसरी विशेष फेरी घेतली जाईल.