शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

OBC Reservation in Maharashtra: वेळ साधावी लागेल! महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण देता येणार; माजी खासदारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 1:52 PM

OBC reservation Possible in Maharashtra: महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस जास्त नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात असे न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या याचिकेवर म्हटले होते. त्यानंतर आज हा निकाल आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरूनसर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा दिला आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्यास परवानगी दिली आहे. परंतू, इकडे महाराष्ट्राची वाट अवघड झाली आहे. यावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण शक्य असल्याचा दावा केला आहे. 

OBC Reservation Breaking News: निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; मध्य़ प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेशओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने केवळ मध्य प्रदेश सरकारलाच परवानगी दिली आहे. तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत. यावरून आता महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने पेच अडकला आहे. 

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पाऊस जास्त नसतो त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात असे न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या याचिकेवर म्हटले होते. त्यानंतर आज हा निकाल आला आहे. यावर माजी खासदार आणि आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेणे शक्य असल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाद्वारे वार्ड रचना करण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस आणि मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल. दरम्यान वीस ते पंचवीस दिवसाच्या आत इंपिरिकल डाटा मिळेल, त्यामुळे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळेल, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात काय पेच....मंडल आयोगाने ५४ टक्के समाजाला दिलेले २७ टक्के आरक्षण लोकसभेने मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र ट्रिपल टेस्ट सुचविल्या होत्या. त्यापैकी दोन टेस्ट राज्य सरकारने पूर्ण केल्या. मात्र तिसरी टेस्ट इम्पिरिकल डाटाशिवाय पूर्ण होणार नाही. मध्य प्रदेश राज्याने निवडणूक आयोगाकडे असलेल्या डाटाचा वापर केला आहे. तसा वापर करता येईल का याचादेखील विचार आयोगाने करावा अशी विनंती आम्ही आयोगाला केली आहे, असे भुजबळ म्हणाले होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय