शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 08:24 IST

महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही.

ठळक मुद्दे श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे.

नाशिक, दि. 3 - नाशिक महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. दहा वर्षांत ६३ हजार श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यात, नरांपेक्षा मादींची संख्या अधिक आहे.

शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे. मुंबई, पुण्यासह सर्वच शहरात त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिकमध्ये पूर्वी पिठाच्या गोळ्यात विषारी औषध टाकून कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त केला जायचा. परंतु, प्राणिप्रेमींनी त्यास कडाडून विरोध केल्यानंतर न्यायालयाने श्वानांना मारण्यावर निर्बंध आणले. नाशिक महापालिकेमार्फत सन २००७ पासून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात आहे. सन २००७ मध्ये पहिल्याच वर्षी १७४९ श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, निर्बीजीकरणाचा वेग वाढत गेला.

सन २०११-१२ मध्ये सर्वाधिक १० हजार १४८ श्वानांचे निर्बीजीकरण झाले तर गेल्या चार वर्षांपासून सरासरी प्रतिवर्षी साडेसहा हजाराच्या आसपास श्वानांवर निर्बीजीकरण होत आहे. दहा वर्षांत महापालिकेने ६३ हजार ४३३ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केला आहे. त्यात ३० हजार ७४ नर तर ३३ हजार ३५९ मादींची संख्या आहे. दहा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरण होऊनही भटक्या श्वानांची संख्या घटल्याचे दिसून येत नाही.महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत प्रतिदिन सुमारे ३० ते ४० श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते.

तीन दिवस त्यांचा पाहुणचार केल्यानंतर त्यांना जेथून पकडले त्याच भागात पुन्हा सोडले जाते. सर्वसाधारणपणे श्वानांचे आयुर्मान १२ ते १५ वर्षांपर्यंत असते. निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एखादे श्वान जरी सुटले तरी त्याच्यापासून आठ ते दहा श्वानांची संख्या वाढू शकते. त्यामुळे, श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य आहे परंतु, त्यांची वाढ रोखणे अशक्य असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो.

श्वानांची संख्या नियंत्रणातमहापालिकेने दहा वर्षांपूर्वी श्वान निर्बीजीकरणाची मोहीम सुरू केली. दहा वर्षांत भटक्या श्वानांची संख्या बºयापैकी नियंत्रणात आलेली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणावर निर्बीजीकरणाचे काम केले आहे. नागरिकांनी उघड्यावर अन्न टाकू नये. महापालिकेमार्फत केवळ निर्बीजीकरण न केलेल्या श्वानांना पकडले जाते. परंतु, निर्बीजीकरण केलेले श्वानही महापालिकेने पकडून न्यावे, अशी अपेक्षा नागरिकांची असते. नागरिकांनी त्याबाबत सहकार्य केले पाहिजे. सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत विभागनिहाय श्वान निर्बीजीकरणाची मोहीम चालते. जेथून श्वान पकडले तेथील नागरिकांच्या स्वाक्षºयाही घेतल्या जातात.- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

दरमहा सरासरी ५५० श्वानांचे निर्बीजीकरणश्वान निर्बीजीकरणाची मोहीम दोन वाहनांमार्फत राबविली जाते. महापालिकेने त्याचे वेळापत्रक तयार केले आहे. महापालिकेचे सहा विभाग आहेत. प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस वाहन फिरविले जाते. प्रतीदिन सुमारे ३० ते ४० श्वानांची धरपकड केली जाते. म्हणजेच विभागातून आठवड्याला ७० ते ८० श्वान पकडले जातात. श्वान निर्बीजीकरणाचा वार्षिक सरासरी दर पाहता ६५०० हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होते. दरमहा सुमारे ५५० श्वानांवर निर्बीजीकरण होत असेल तर भटक्या श्वानांच्या संख्येत घट का होत नाही, हा एक प्रश्न सामान्यांना भेडसावत असतो.

भटक्या श्वानांमुळे अपघाताच्या घटना

महामार्गावर, रस्त्यांवर दररोज असंख्य श्वान गाडीखाली येऊन चिरडून मृत्युमुखी पडतात. अभ्यासकांच्या मते, बव्हंशी अपघात हे भटक्या श्वानांमुळे होतात. रात्रीच्या सुमारास झुंडीने श्वानांची फौज वाहनचालकाच्या मागे धावत सुटते आणि चालकाचे नियंत्रण सुटून अपघातांना निमंत्रण मिळते. याचबरोबर दुभाजकांमधून अथवा रस्ता ओलांडताना श्वान आडवे येऊन अपघात घडण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे, अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. भटक्या श्वानांपासून होणाºया अपघातांची मात्र पोलीस दप्तरी नोंद आढळून येत नाही.