शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 05:59 IST

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी, यामुळे १ मार्च ते १४ मे या काळात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर पोहोचली असून संशयित उष्माघाताच्या मृत्यूंची संख्या २९ झाली आहे. उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीने उष्माघाताने १७ मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला दिली आहे.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, यासाठी जनतेचे प्रबोधन करण्यात येते. उष्मा काही व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरू शकतो, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उष्णता विकारांवर उपचार करण्यासाठी सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या वाढत्या उष्णतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले.

- उष्णतेमुळे मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो, तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. 

- उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक,  काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक आणि निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

जिल्हा    रुग्ण    संशयित     उष्माघात मृत्यू ठाणे     २          ०    ०पुणे     ३३    ०     ०कोल्हापूर     १          ०     ०औरंगाबाद     १५    ५    २लातूर    १           १    १नाशिक     १७          ४    ४अकोला    ५१         ४     १नागपूर       ४६०         १५    ९एकूण       ५८०          २९    १७

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र