शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 05:59 IST

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी, यामुळे १ मार्च ते १४ मे या काळात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर पोहोचली असून संशयित उष्माघाताच्या मृत्यूंची संख्या २९ झाली आहे. उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीने उष्माघाताने १७ मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला दिली आहे.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, यासाठी जनतेचे प्रबोधन करण्यात येते. उष्मा काही व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरू शकतो, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उष्णता विकारांवर उपचार करण्यासाठी सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या वाढत्या उष्णतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले.

- उष्णतेमुळे मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो, तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. 

- उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक,  काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक आणि निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

जिल्हा    रुग्ण    संशयित     उष्माघात मृत्यू ठाणे     २          ०    ०पुणे     ३३    ०     ०कोल्हापूर     १          ०     ०औरंगाबाद     १५    ५    २लातूर    १           १    १नाशिक     १७          ४    ४अकोला    ५१         ४     १नागपूर       ४६०         १५    ९एकूण       ५८०          २९    १७

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र