शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

‘त्या’ भूसंपादन वादातून अधिकारी धारेवर; ग्रामस्थांनी दिला न्यायालयात जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 07:46 IST

बाधित होणाऱ्या खऱ्या जमीनधारकांना एमएमआरडीएचे अधिकारी डावलून बैठका बोलावून चर्चा करीत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

उरण - करंजा ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतूला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वाधिक जमीन, जागा नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत आहे. असे असतानाही मंगळवारी भूसंपादन आवश्यक सर्वेक्षण, मोजणीसाठी संबंध नसलेल्या लोकांना बोलावल्याने संतप्त नवापाडा ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

रेवस-करंजा पूल दृष्टिपथास येऊ लागला आहे. मात्र, जोपर्यंत शेतकरी, जमीनधारकांना विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा होत नाही, मोबदला ठरत नाही तोपर्यंत सर्वेक्षण, मोजणीसाठी ग्रामस्थांच्या विरोधामुळे या पुलाच्या जोडरस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्याशिवाय बाधित होणाऱ्या खऱ्या जमीनधारकांना एमएमआरडीएचे अधिकारी डावलून बैठका बोलावून चर्चा करीत असल्याने नवापाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

... तर न्यायालयात जाण्याचा इशारामोजणीसाठी आलेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नवापाडा ग्रामस्थांना डावलूनच कामाला सुरुवात केली होती. ही बाब समजताच नवापाडा ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमआरडीएचे उपअभियंता अनिरुद्ध बोराडे यांची भेट घेतली. मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी नवापाडा ग्रामस्थांची सर्व्हे नं. २२-१ मधील आठ एकरहून अधिक जमीन पुलाच्या जोड रस्त्यासाठी बाधित होत आहे. पुलाच्या जोडरस्त्यासाठी सर्वाधिक जमीन नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत असताना त्यांना चर्चा, बैठकीसाठी आमंत्रित केले जात नाही. 

नेहमीच ग्रामस्थांना डावलूनच हौसे, नवसे, गवशांना बोलावण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आणून कोळी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. प्रकल्पाला नवापाडा ग्रामस्थांचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. मात्र, यापुढेही नवापाडा ग्रामस्थांना डावलल्यास न्यायहक्कासाठी  न्यायालयात जाण्याचा निर्वाणीचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए