शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
3
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
4
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
5
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
6
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
7
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
8
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
9
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
10
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!
11
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
12
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
13
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
14
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
15
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
16
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
17
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
18
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
19
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
20
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट

अब की बार...मोदी सरकार

By admin | Updated: May 17, 2014 02:49 IST

कोट्यवधी भारतीयांनी टाकलेल्या विश्वासाच्या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदींनी दिल्ली काबीज केली. गुजरातच्या जादूगाराने लोकशाहीत क्रांती घडवून जगाला अचंबित केले.

कोट्यवधी भारतीयांनी टाकलेल्या विश्वासाच्या लाटेवर स्वार होत नरेंद्र मोदींनी दिल्ली काबीज केली. गुजरातच्या जादूगाराने लोकशाहीत क्रांती घडवून जगाला अचंबित केले. कोणत्याही राजकीय घराण्याचा वारसा नसलेल्या मोदींनी काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून या महान देशाच्या प्रगतीस मुख्य अडसर ठरलेल्या २५ वर्षांच्या आघाडीच्या सत्ताकारणास मूठमाती दिली. गेल्या ६५ वर्षांत काँग्रेसव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविण्याची अविश्वसनीय कामगिरी करून मोदींनी भारतीय जनता पार्टीला राजकारणाच्या केंद्रस्थानी प्रस्थापित केले. देशाचा भावी पंतप्रधान आधीच जाहीर करून त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याचा अनोखा प्रयोग भाजपाने केला व देशाला खंबीर व निर्णायकी नेतृत्व मिळावे यासाठी व्याकूळ झालेल्या मतदारांनी हा प्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतला. असह्य ऊन-पावसाची पर्वा न करता ६६ टक्के एवढ्या न भूतो प्रमाणात मतदार घराबाहेर पडले तेव्हाच या सत्तांतराची स्पष्ट चाहूल लागलेली होती. पण हे मतदान राजकारणाची दिशा कायमस्वरूपी बदलण्याच्या दृढ इराद्याने केले आहे याचा पुसटसा अंदाजही त्यांनी भल्याभल्यांना लागू दिला नव्हता. त्यामुळे शुक्रवारच्या निकालांनी यशाची अपेक्षा असलेल्यांनाही थक्क केले. मोदींच्या हाती सत्ता सोपवायला देशातील ८० कोटी मतदार वेडा नाही, अशा मग्रुरीत असलेल्या काँग्रेसला मतदारराजाने वेड्यात काढले. मतदानाचा कल स्पष्ट होताच देशभर उत्साह संचारला. प्रत्येक शहरात व प्रत्येक रस्त्यावर भगवा विजयोत्सव साजरा होत असताना बेशुद्धावस्थेत गेलेली काँग्रेस सायंकाळी शुद्धीवर आली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी लोकांपुढे येऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारत मोदींचे नाव न घेता नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेला आणि देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारा पहिला नेता आणि स्वतंत्र भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळविणारा उमेदवार अशा दोन ऐतिहासिक नोंदींचे धनी ठरलेल्या मोदींनी विजयानंतर बडोदेकरांच्या साक्षीने देशभरातील जनतेशी संवाद साधला. प्रचाराला सुरुवात करताना, अब अच्छे दिन आएंगे, असा आशावाद जागविणार्‍या मोदींना ‘अब अच्छे दिन आ गए’ अशा घोषणा देत बडोदेकरांनी डोक्यावर घेतले. निकालानंतरच्या या पहिल्याच भाषणात यापुढे शरीराचा प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या विशाल भारतासाठी वेचण्याचे अभिवचन मोदींनी दिले. वाजपेयींच्या कारकिर्दीचा काव्यसंग्रह ५१ कवितांचा होता. या निवडणुकीत मोदींनी मिळविलेले अपूर्व यश ही जणू अटलजींची बावन्नावी कविता ठरली आहे.