शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 03:59 IST

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

औरंगाबाद/बीड : आता जनतेला बदल हवा आहे. बदल गरजेचा आहे. केंद्र व राज्यातील सरकार आता बदलण्याची गरज आहे, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे केले. तर देशातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, दलित त्रस्त आहेत. भाजपाने केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसºया टप्प्याची सांगता औरंगाबादला जाहीर सभेने झाली. भाजपा सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त महागाई असलेला देश बनला आहे. सीमेवर तीस वर्षांत मारले गेले नाहीत, एवढे जवान या चार वर्षांत मारले गेले. यांनी काळा पैसा तर आणलाच नाही; पण देशातील पांढरा पैसा काही उद्योगपतींनी पळवला. आमच्या सरकारने जे दिले होते, ते नोटाबंदी व जीएसटीमुळे या सरकारने हिसकावून घेतले. बेरोजगारी वाढवली. सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदी मौन धारण करून असतात, असे आझाद म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणणार होता? तो कुठे आहे? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होते? तेही कुठे आहेत? आता हे सांगताहेत की, ते आमचे ‘चुनावी जुमले’ होते. पुढच्या वेळी हेच सरकार सत्तेवर आले, तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत; पण संविधान बदलले गेले तर लोकशाही राहणार नाही. हे लक्षात घ्या, असा इशारा खर्गे यांनी दिला.दुष्काळाचा जीआर म्हणजे फसवणूकदुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळाच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ फसवी घोषणा करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षखा. अशोक चव्हाण यांनी बीड येथे केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस