शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 03:59 IST

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

औरंगाबाद/बीड : आता जनतेला बदल हवा आहे. बदल गरजेचा आहे. केंद्र व राज्यातील सरकार आता बदलण्याची गरज आहे, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे केले. तर देशातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, दलित त्रस्त आहेत. भाजपाने केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसºया टप्प्याची सांगता औरंगाबादला जाहीर सभेने झाली. भाजपा सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त महागाई असलेला देश बनला आहे. सीमेवर तीस वर्षांत मारले गेले नाहीत, एवढे जवान या चार वर्षांत मारले गेले. यांनी काळा पैसा तर आणलाच नाही; पण देशातील पांढरा पैसा काही उद्योगपतींनी पळवला. आमच्या सरकारने जे दिले होते, ते नोटाबंदी व जीएसटीमुळे या सरकारने हिसकावून घेतले. बेरोजगारी वाढवली. सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदी मौन धारण करून असतात, असे आझाद म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणणार होता? तो कुठे आहे? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होते? तेही कुठे आहेत? आता हे सांगताहेत की, ते आमचे ‘चुनावी जुमले’ होते. पुढच्या वेळी हेच सरकार सत्तेवर आले, तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत; पण संविधान बदलले गेले तर लोकशाही राहणार नाही. हे लक्षात घ्या, असा इशारा खर्गे यांनी दिला.दुष्काळाचा जीआर म्हणजे फसवणूकदुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळाच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ फसवी घोषणा करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षखा. अशोक चव्हाण यांनी बीड येथे केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस