शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"आता मल्लिकार्जुन खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा", आशिष देशमुख यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:08 IST

Mallikarjun Kharge: शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. एकीकडे शरद पवार यांची मनधरणी करून त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते आग्रही भूमिका घेत आहेत. दरम्यान, या निर्णयावरून काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.

आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये सर्वस्वी निर्णय हे राहुल गांधीच घेतात. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी खर्गे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा निवडणुकीत आम्ही शशी थरूर यांच्यासोबत होतो. मात्र निवडून सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या एआयसीसीमधील महासचिव,  इतर पदाधिकारी असतील. तसेच सीडब्ल्यूसी होऊन दोन महिने होत आहे आहे. मात्र सीडब्ल्यूसीची निवड राहुल गांधी करू देत नाही आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून शरद पवार यांनी एक प्रशंसनीय आणि दुसऱ्या लोकांना प्रेरित करणारा निर्णय घेतला आहे, असे देशमुख म्हणाले. 

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत ते म्हणाले की, ही परिस्थिती काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. तर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. त्या कालावधीमध्ये देखील त्या कालावधीत देशील एकही दिवस एआयसीसीच्या कार्यालयात न येता राहुल गांधी हे देशभरातील काँग्रेसचे निर्णय घेत होते. ही बाब काँग्रेसमधील कुणीही जबाबदार व्यक्ती सांगेल, असे देशमुख म्हणाले.

हे सर्व व्हावं आणि या वयामध्ये शरद पवार यांनी जे कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. त्याच पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सातत्याने होत असलेल्या अपमानाच्या पार्श्वभूमीवर पदमुक्त व्हावं. तसेच तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली पाहिजे. शशी थरूर यांच्यामागे देशातील तरुण उभे राहिले होते. त्यांना जर संधी मिळाली असती तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते. आता शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेसमध्ये वयोवृद्ध झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्यांना सातत्याने काम करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून आदेश घ्यावे लागतात. त्यांनी पायउतार झाल्यास त्यांची निवृत्ती ही ग्रेसफूल ठरेल. शशी थरूर यांच्याकडे पद मिळाल्यास ते या पदाला अधिक चांगला न्याय देऊ शकले असते, असेही आशिष देशमुख म्हणाले.         

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार