शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"आता मल्लिकार्जुन खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा", आशिष देशमुख यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:08 IST

Mallikarjun Kharge: शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. एकीकडे शरद पवार यांची मनधरणी करून त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते आग्रही भूमिका घेत आहेत. दरम्यान, या निर्णयावरून काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.

आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये सर्वस्वी निर्णय हे राहुल गांधीच घेतात. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी खर्गे राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा निवडणुकीत आम्ही शशी थरूर यांच्यासोबत होतो. मात्र निवडून सहा महिने झाले तरी अजूनपर्यंत मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या एआयसीसीमधील महासचिव,  इतर पदाधिकारी असतील. तसेच सीडब्ल्यूसी होऊन दोन महिने होत आहे आहे. मात्र सीडब्ल्यूसीची निवड राहुल गांधी करू देत नाही आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून शरद पवार यांनी एक प्रशंसनीय आणि दुसऱ्या लोकांना प्रेरित करणारा निर्णय घेतला आहे, असे देशमुख म्हणाले. 

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत ते म्हणाले की, ही परिस्थिती काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. तर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. त्या कालावधीमध्ये देखील त्या कालावधीत देशील एकही दिवस एआयसीसीच्या कार्यालयात न येता राहुल गांधी हे देशभरातील काँग्रेसचे निर्णय घेत होते. ही बाब काँग्रेसमधील कुणीही जबाबदार व्यक्ती सांगेल, असे देशमुख म्हणाले.

हे सर्व व्हावं आणि या वयामध्ये शरद पवार यांनी जे कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. त्याच पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सातत्याने होत असलेल्या अपमानाच्या पार्श्वभूमीवर पदमुक्त व्हावं. तसेच तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली पाहिजे. शशी थरूर यांच्यामागे देशातील तरुण उभे राहिले होते. त्यांना जर संधी मिळाली असती तर काँग्रेसला चांगले दिवस आले असते. आता शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेसमध्ये वयोवृद्ध झालेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्यांना सातत्याने काम करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून आदेश घ्यावे लागतात. त्यांनी पायउतार झाल्यास त्यांची निवृत्ती ही ग्रेसफूल ठरेल. शशी थरूर यांच्याकडे पद मिळाल्यास ते या पदाला अधिक चांगला न्याय देऊ शकले असते, असेही आशिष देशमुख म्हणाले.         

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAshish Deshmukhआशीष देशमुखcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार