शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 15:17 IST

Maharashtra Government : खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे.

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडला आहे. काँग्रेसला मनासारखे खाते मिळाले नसल्यामुळे हा विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी यावर तोडगा निघेल अशी शक्यता असली तरी काँग्रेसला आता उपमुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. 

महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर काँग्रेस समाधानी नाही. महत्त्वाच्या खात्यांपैकी केवळ महसूल काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. याशिवया उर्जा, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन अशी खाती काँग्रेसला मिळणार आहेत. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चांगली खाती येणार आहेत. 

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदामुळे काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडला होता. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित मानले जात होते. मात्र नवीन रचनेत गृहखातं राष्ट्रवादीने घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा स्थितीत काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असून तसा दावा करण्यात येत आहे. 

खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे. त्यावर आता महाविकास आघाडीत काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी