शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 15:17 IST

Maharashtra Government : खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे.

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडला आहे. काँग्रेसला मनासारखे खाते मिळाले नसल्यामुळे हा विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी यावर तोडगा निघेल अशी शक्यता असली तरी काँग्रेसला आता उपमुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. 

महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर काँग्रेस समाधानी नाही. महत्त्वाच्या खात्यांपैकी केवळ महसूल काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. याशिवया उर्जा, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन अशी खाती काँग्रेसला मिळणार आहेत. त्या तुलनेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चांगली खाती येणार आहेत. 

दरम्यान विधानसभा अध्यक्षपदामुळे काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा सोडला होता. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित मानले जात होते. मात्र नवीन रचनेत गृहखातं राष्ट्रवादीने घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा स्थितीत काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असून तसा दावा करण्यात येत आहे. 

खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे. त्यावर आता महाविकास आघाडीत काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी