शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान; पालघर आणि गडचिरोलील प्रमाण जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 20:27 IST

राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत.

- मनोज ताजने 

गडचिरोली : भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे. अनेक अशिक्षित मतदारांनी ईव्हीएमवरील सर्वात खाली असलेले बटन दाबल्याने नोटाचे मतदान वाढले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मतपत्रिकेवरील कोणीही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’, अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ (यापैकी कोणीही नाही) असा पर्याय ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर सर्वात शेवटी दिला जातो. अशिक्षित मतदारांना ईव्हीएमवरील कोणते बटन दाबायचे हे कळले नसल्यामुळे शेवटचे बटन दाबून ते मोकळे होतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. त्यामुळेच की काय आदिवासीबहुल, मागास भागात नोटाच्या मतांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीतही गडचिरोली-चिमूर क्षेत्रात नोटाला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान होते.राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. याशिवाय ठाणे, नंदूरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यांतही नोटाचे प्रमाण जास्त आहे. केवळ मतदारांच्या अशिक्षितपणामुळे त्यांच्याकडून नोटाचा पर्याय निवडल्या जात असेल तर यापुढील निवडणुकांमध्ये योग्य ती सुधारणा करावी अशीही मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबईतही नोटाप्रगत मुंबईमधील सहाही मतदार संघात नोटाचे प्रमाण जास्त आहे. त्यात मुंबई-दक्षिण (१.८९ टक्के), मुंबई-उत्तर (१.२१ टक्के), मुंबई उत्तर-मध्य (१.१८ टक्के), मुंबई उत्तर-पूर्व (१.३७), मुंबई उत्तर पश्चिम (१.९४ टक्के) आणि मुंबई दक्षिण मध्य (१.७५ टक्के) असे नोटाचे प्रमाण आहे.

‘नोटा’धारक टॉप १० मतदार संघमतदार संघ           नोटाची मते             टक्केवारीपालघर                   २९,४७९                 २.४५ %गडचिरोली-चिमूर     २४,५९९                 २.१५ %नंदूरबार                  २१,९२५                १.७१ %ठाणे                       २०,४२६                १.७५ %मुंबई उत्तर-दक्षिण   १८,२२५                 १.९४ %भिवंडी                    १६,३९७                 १.६३ %मावळ                    १५,७७९                 १.१५ %जालना                   १५,६३७                 १.२९ %मुंबई दक्षिण            १५,११५                 १.८९ %कल्याण                  १३,०१२                १.४६ %

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVotingमतदान