शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पंचनामा नव्हे, नमुना सर्वेक्षण सुरू!

By admin | Updated: October 9, 2016 00:32 IST

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे होणार नसले तरी नमुना सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले आहे. तशी घोषणाही

- स.सो. खंडाळकर, औरंगाबाद

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे होणार नसले तरी नमुना सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत; परंतु विमा कंपनीचे अधिकारी, महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नमुना सर्वेक्षण करण्यात येईल व नुकसानीचा अंदाज घेतला जाईल. या सर्वेक्षणानंतर प्रमाण उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्नही पाहिले जाईल. पीक कापणी प्रयोगावरून किती नुकसान झाले हे ठरवले जाईल. विम्याचा प्रीमियम छोटा आहे; पण त्यात पिकांना संरक्षण दिले पाहिजे, ही सक्ती आहे. त्यानुसार लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे दांगट म्हणाले.अतिवृष्टीमुळे ८३ जणांचा मृत्यू- जूनपासून मराठवाड्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. चार महिन्यांत तब्बल ८३ नागरिकांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत ७, नांदेड जिल्ह्यात २२, जालना जिल्ह्यात ७, बीड जिल्ह्यात १७, परभणी जिल्ह्यात ८, लातूर जिल्ह्यात ८, हिंगोली जिल्ह्यात ९ व उस्मानाबाद जिल्ह्यात ५ अशी ही मृत्युसंख्या आहे. तर, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन तसेच शेतीसाठी मोठी गुंतवणूक असलेली तब्बल ७३२ लहान-मोठी जनावरे या नैसर्गिक आपत्तीत दगावली आहेत. सर्व नुकसानीचीही नियमानुसार भरपाई मिळणारच आहे; परंतु अलीकडच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर जमिनीतील झालेले नुकसान महत्त्वाचे आहे. त्याची योग्य व त्वरित नुकसानभरपाई सरकारी यंत्रणेने घाई केली पाहिजे अन्यथा जनक्षोभ वाढून आंदोलने होणारच नाहीत, हे सांगता येत नाही.