शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 17:27 IST

केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही..

ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणमध्ये ' सावरकर विचार दर्शन' या विषयावर आयोजित व्याख्यानस्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले

पिंपरी : फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी जोरदार फटकेबाजी अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. २५) निगडी प्राधिकरण येथे केली. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. सावरकरांचे विचार आचरणात आणले नाहीत म्हणूनच आज देशाची ही अवस्था झाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये सावरकर विचार दर्शन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आण्णाभाऊ साठे अर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ कार्यालयाच्या मैदानावर आयोजित या व्याख्यानाला सावरकर प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी पावसाने हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात भिजत केलेल्या भाषणाचा उल्लेख न करता अभिनेते शरद पोंक्षे यांनी फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी टिप्पणी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खसखस पिकली. सावरकरांवरील विचार मांडताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. लोकशाही राष्ट्रामध्ये एका विशिष्ट मयार्देपर्यंत अल्पसंख्यांकांना महत्त्व आहे हे आम्हीही मान्य करतो. पण तेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यकर्ते शासन करायला लागले तर मात्र त्या देशाचे फक्त वाटोळे होते. ज्या देशातल्या बहुसंख्य माणसांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही,

 

 

 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnigdiनिगडीSharad Ponksheशरद पोंक्षेHinduहिंदूSharad Pawarशरद पवार