शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

फक्त निवडणुकीच्या सभाच नाही तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात : शरद पोंक्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 17:27 IST

केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही..

ठळक मुद्देनिगडी प्राधिकरणमध्ये ' सावरकर विचार दर्शन' या विषयावर आयोजित व्याख्यानस्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असंख्य गैरसमज पसरवले गेले

पिंपरी : फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी जोरदार फटकेबाजी अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. २५) निगडी प्राधिकरण येथे केली. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. सावरकरांचे विचार आचरणात आणले नाहीत म्हणूनच आज देशाची ही अवस्था झाली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजप, सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरणमध्ये सावरकर विचार दर्शन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आण्णाभाऊ साठे अर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व शहर सरचिटणीस अमोल थोरात यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निगडी, प्राधिकरण येथील खानदेश मित्र मंडळ कार्यालयाच्या मैदानावर आयोजित या व्याख्यानाला सावरकर प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी शेवटी पावसाने हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात भिजत केलेल्या भाषणाचा उल्लेख न करता अभिनेते शरद पोंक्षे यांनी फक्त इलेक्शनच्या सभा भिजत होत नाहीत, तर सावरकरांवरील भाषणेही पावसात भिजत होतात, अशी टिप्पणी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खसखस पिकली. सावरकरांवरील विचार मांडताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केले. केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. लोकशाही राष्ट्रामध्ये एका विशिष्ट मयार्देपर्यंत अल्पसंख्यांकांना महत्त्व आहे हे आम्हीही मान्य करतो. पण तेच महत्त्व लक्षात घेऊन राज्यकर्ते शासन करायला लागले तर मात्र त्या देशाचे फक्त वाटोळे होते. ज्या देशातल्या बहुसंख्य माणसांचा अनादर केला जातो ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही,

 

 

 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnigdiनिगडीSharad Ponksheशरद पोंक्षेHinduहिंदूSharad Pawarशरद पवार