शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 22:44 IST

सीएम चषक स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. 

मुंबई : आजवर अनेकदा देशात गरिबी हटावची घोषणा झाली, पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे गरिबांना खरा फायदा मिळतो आहे. गरिबांना गॅस, वीज मिळत आहे. जनधन खात्यांमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात सबसिडी जमा होते आहे. आज खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महागठबंधनच्या प्रयोगावर टीका केली. 

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने चुनाभट्टी येथील सौमैय्या मैदानावर आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर आदी नेते उपस्थित होते. सीएम चषकाच्या माध्यमातून तब्बल ४२ लाख तरूणतरूणींना इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना खेळाच्या मैदानावर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी युवा मोर्चाचे अभिनंदन केले. गरिबी हटावच्या घोषणा झाल्या पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आता मोदींच्या प्रत्येक योजनेचा फायदा थेट गरिबांना होतो. बँक खाती उघडली, थेट खात्यात अनुदान देण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे अनुदानात एक पैशाचाही भ्रष्टाचार करता येत नाही. त्यामुळे देशाचे ९५ हजार कोटी रुपये वाचले. आता पैसा खाता येत नाही म्हणूनच महाआघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र, असे कितीही एकत्र आले तरी पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकणार नाहीत. आगामी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

११ कोटी पेक्षा जास्त युवकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. कालच्या अर्थसंकल्पात गरीब शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत देण्याची घोषणा झाली. मजुरांकरता पेन्शन सुरू केली आहे. महाराष्ट्रातही ६९ लाख  शेतकऱ्यांना कर्जमाफीची ५० हजार कोटीची रक्कम थेट खात्यात जमा केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीतयावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यात्रांवरही टीका केली. विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीत. त्यामुळे कॅमेरा फक्त स्टेजवरच ठेवा, अशी मीडियाला विनंती करतात. आमच्या काळात सगळीच कामे झाली असे नाही. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे कामे केली, असे फडणवीस म्हणाले. यावेळी पूनम महाजन, योगेश टिळेकर यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी