शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 22:44 IST

सीएम चषक स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. 

मुंबई : आजवर अनेकदा देशात गरिबी हटावची घोषणा झाली, पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे गरिबांना खरा फायदा मिळतो आहे. गरिबांना गॅस, वीज मिळत आहे. जनधन खात्यांमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात सबसिडी जमा होते आहे. आज खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महागठबंधनच्या प्रयोगावर टीका केली. 

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने चुनाभट्टी येथील सौमैय्या मैदानावर आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर आदी नेते उपस्थित होते. सीएम चषकाच्या माध्यमातून तब्बल ४२ लाख तरूणतरूणींना इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना खेळाच्या मैदानावर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी युवा मोर्चाचे अभिनंदन केले. गरिबी हटावच्या घोषणा झाल्या पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आता मोदींच्या प्रत्येक योजनेचा फायदा थेट गरिबांना होतो. बँक खाती उघडली, थेट खात्यात अनुदान देण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे अनुदानात एक पैशाचाही भ्रष्टाचार करता येत नाही. त्यामुळे देशाचे ९५ हजार कोटी रुपये वाचले. आता पैसा खाता येत नाही म्हणूनच महाआघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र, असे कितीही एकत्र आले तरी पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकणार नाहीत. आगामी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

११ कोटी पेक्षा जास्त युवकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. कालच्या अर्थसंकल्पात गरीब शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत देण्याची घोषणा झाली. मजुरांकरता पेन्शन सुरू केली आहे. महाराष्ट्रातही ६९ लाख  शेतकऱ्यांना कर्जमाफीची ५० हजार कोटीची रक्कम थेट खात्यात जमा केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीतयावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यात्रांवरही टीका केली. विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीत. त्यामुळे कॅमेरा फक्त स्टेजवरच ठेवा, अशी मीडियाला विनंती करतात. आमच्या काळात सगळीच कामे झाली असे नाही. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे कामे केली, असे फडणवीस म्हणाले. यावेळी पूनम महाजन, योगेश टिळेकर यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी