शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:17 IST

Ramdas Athawale on Raj Thackeray MNS: लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीला राज्यात महायुतीला साथ देण्यासाठी राज ठाकरे बिनशर्त आले होते. लोकसभेला भाजपाला अपेक्षित निकाल आला नसला तरी यासाठी अजित पवारांना सोबत घेतल्याने नुकसान झाल्याचे तर्क भाजपा, शिवसेनेकडून काढण्यात आले. त्यानुसार गेले १०० दिवस अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. अशातच एनडीएचे घटकपक्ष राहिलेले रामदास आठवले यांनी अजित पवारांना नाही तर राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असा सल्ला भाजपाला दिला आहे.

राज ठाकरेंचा महायुतीला फायदा झालेला नाही. अजित पवारांमुळे महायुतीचे काहीही नुकसान झालेले नाही. ज्या १७ जागा आल्या आहेत त्यात अजित पवारांचाही वाटा आहे. पण राज ठाकरेंना सोबत घेऊ नका. मी तुमच्यासोबत असल्याने राज ठाकरेंची महायुतीत गरज नाही, असे वक्तव्य आठवले यांनी केले आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पालघरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या आरक्षण संपविण्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल पण देशातील आरक्षण कदापी संपणार नाही, असे आठवले म्हणाले. तसेच अशी वक्तव्ये करणे त्यांना शोभत नाही, अशी टीकाही केली. राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी आठवले यांनी केली. 

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेच्या २८८ जागांच्या तयारीला लागा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या. आता पुन्हा राज यांना विधानसभेला सोबत घेतले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. राज यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. राज यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. परंतू, या ताकदीचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये होत नाही.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेMahayutiमहायुती