शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:17 IST

Ramdas Athawale on Raj Thackeray MNS: लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीला राज्यात महायुतीला साथ देण्यासाठी राज ठाकरे बिनशर्त आले होते. लोकसभेला भाजपाला अपेक्षित निकाल आला नसला तरी यासाठी अजित पवारांना सोबत घेतल्याने नुकसान झाल्याचे तर्क भाजपा, शिवसेनेकडून काढण्यात आले. त्यानुसार गेले १०० दिवस अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. अशातच एनडीएचे घटकपक्ष राहिलेले रामदास आठवले यांनी अजित पवारांना नाही तर राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असा सल्ला भाजपाला दिला आहे.

राज ठाकरेंचा महायुतीला फायदा झालेला नाही. अजित पवारांमुळे महायुतीचे काहीही नुकसान झालेले नाही. ज्या १७ जागा आल्या आहेत त्यात अजित पवारांचाही वाटा आहे. पण राज ठाकरेंना सोबत घेऊ नका. मी तुमच्यासोबत असल्याने राज ठाकरेंची महायुतीत गरज नाही, असे वक्तव्य आठवले यांनी केले आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पालघरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या आरक्षण संपविण्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल पण देशातील आरक्षण कदापी संपणार नाही, असे आठवले म्हणाले. तसेच अशी वक्तव्ये करणे त्यांना शोभत नाही, अशी टीकाही केली. राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी आठवले यांनी केली. 

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेच्या २८८ जागांच्या तयारीला लागा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या. आता पुन्हा राज यांना विधानसभेला सोबत घेतले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. राज यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. राज यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. परंतू, या ताकदीचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये होत नाही.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेMahayutiमहायुती