शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नाहीत- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:03 IST

मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे.

ठळक मुद्देवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील.मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे

मुंबई, दि. 8- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील. मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. राजकीय पुढारी जरी यामध्ये सहभागी झाले तरी तिथे कुठल्याही नेत्याला भाषण करता येणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं, या मागण्यांसाठी मुंबईतून भव्य मोर्चा निघेल. या मोर्चातील एका शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. शिष्ठमंडळाच्या या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य उपचार करतील, अशी आशा असल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत. मंगळवारी अधिवेशना दरम्यान माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आपापल्या जिल्ह्यात मोर्चे काढले गेले. आत्तापर्यंत निघालेल्या प्रत्येक मोर्चात मराठा समाजाची आरक्षणासाठीची एकजुट दिसून आली. बुधवारीही तसाच भव्य मोर्चा मुंबईतून निघणार आहे. वीस ते पंचवीस लाख लोक यामध्ये सहभागी होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. कुठलाही समाज मागासलेला असतो तेव्हा त्याच्या आरक्षण देण्याचा विचार केला जातो. आजपर्यंत अनेक समाजांनी आरक्षणाची मागणी केली तेव्हा मराठा समाजाने त्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे उद्याच्या या मोर्च्यात जात-धर्म न पाहता उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यावर मुख्यमंत्री सभागृहात त्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. या मोर्चातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, अशी आशासुद्धा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. 

आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.

मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चेंबूरपासून वाहतुकीला बगलमुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

मोर्चेकऱ्यांसमोर संयुक्त समितीचा प्रस्ताव!मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. मोर्चाच्या आधी सरकार आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा