शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नाहीत- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:03 IST

मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे.

ठळक मुद्देवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील.मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे

मुंबई, दि. 8- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील तसंच राजकीय नेतेही हजर राहतील. मराठ्यांचा हा एल्गार आरक्षणाच्या मागणीसाठी आहे, त्यामुळे उद्याच्या या भव्य मोर्चात कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी म्हंटलं आहे. राजकीय पुढारी जरी यामध्ये सहभागी झाले तरी तिथे कुठल्याही नेत्याला भाषण करता येणार नसल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं, या मागण्यांसाठी मुंबईतून भव्य मोर्चा निघेल. या मोर्चातील एका शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. शिष्ठमंडळाच्या या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य उपचार करतील, अशी आशा असल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत. मंगळवारी अधिवेशना दरम्यान माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाकडून आपापल्या जिल्ह्यात मोर्चे काढले गेले. आत्तापर्यंत निघालेल्या प्रत्येक मोर्चात मराठा समाजाची आरक्षणासाठीची एकजुट दिसून आली. बुधवारीही तसाच भव्य मोर्चा मुंबईतून निघणार आहे. वीस ते पंचवीस लाख लोक यामध्ये सहभागी होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत. कुठलाही समाज मागासलेला असतो तेव्हा त्याच्या आरक्षण देण्याचा विचार केला जातो. आजपर्यंत अनेक समाजांनी आरक्षणाची मागणी केली तेव्हा मराठा समाजाने त्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे उद्याच्या या मोर्च्यात जात-धर्म न पाहता उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, असं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे. मराठा क्रांती मोर्च्याच्या आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यावर मुख्यमंत्री सभागृहात त्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. या मोर्चातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, अशी आशासुद्धा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. 

आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.

मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चेंबूरपासून वाहतुकीला बगलमुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

मोर्चेकऱ्यांसमोर संयुक्त समितीचा प्रस्ताव!मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. मोर्चाच्या आधी सरकार आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा