शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Coronavirus: इतर कुठलीही प्रवासी रेल्वे सुरू होणार नाही, रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 08:56 IST

इतर कुठलीही प्रवासी रेल्वे सुरु होणार नाही, रेल्वे मंत्रालयाच स्पष्टीकरण

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे विभागाकडून देशातील काही राज्यातून प्रवासी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. मात्र, सोडण्यात आलेल्या गाड्या केवळ राज्य सरकारच्या विनंतीवरुन सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून परराज्यात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. राज्य सरकारच्या सांगण्यावरुन लॉकडाऊन काळात शेल्टर होममध्ये अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविसाठी श्रमिक ट्रेन सुरु केली होती. मात्र, इतर कुठलीही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार व नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. तसेच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. त्यामुळे, रेल्वे सोडण्यात येत आहेत की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. केवळ राज्य सरकारच्या सूचनेनुसारच प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात येईल, असेही रेल्वे विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कुणीही रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये, इतर कुणालाही रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. तसेच, रेल्वेकडून तिकीटांची विक्रीही बंद ठेवण्यात आली आहे. 

देशभर लाखो प्रवाशांची यातायात करणा-या लांबपल्याच्या गाड्यांचे रेक्स हे ठिकठिकाणी उभे असून त्यांच्यावर काही ठिकाणी सीसी टीव्ही तर जेथे ती सुविधा नाही तेथे रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्या गाड्यांची इंजिन देखिल विविध ठिकाणी उभी असून  त्यांची देखभाल मात्र सर्वत्र केली जात आहे. अनेक इंजिन ही सध्या सुरु असलेल्या मालगाड्यांची वाहतूकीसाठी टप्प्यांवर चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये कल्याण, मुलुंड, इगपुरी, लोणावळा या भागात देखिल इंजिन सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. त्याच पद्धतीने पुणे, नागपूर, सोलापूर या मंडळांमध्येही ती सेवा कार्यरत आहे. 

दरम्यान, जेथे लांबपल्याच्या गाड्यांचे डबे उभे आहेत त्या डब्यांमधील पंखे, स्वच्छतागृहांमधील नळ, वॉशबेसिन, डब्यांमधील पंखे, दिवे तसेच वातानुकूलीत डब्यांमधील अन्य सुविधा, आरसे आदींची चोरी होऊ नये यासाठी आरपीएफचे जवान सतर्क ठेवण्यात आले आहेत.  राष्ट्रीय संपत्तीवर दगडफेक होऊ नये, त्याचे नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान जेथे आवश्यकता आहे तेथे वेळोवेळी डबे स्वच्छ करणे, निर्जंतुक करणे ही कामे देखिल करण्यात येत आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेMumbaiमुंबईRailway Passengerरेल्वे प्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस