शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'माझे बाबा जे काम करतात ते कोणीच करणार नाही'; रतन टाटांनी शेअर केली 'त्या' मुलाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 16:24 IST

Ratan Tata Shared Emotional Story To Provide Help To Sanitation Workers | मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात

मुंबई - श्रीमंतीच्या शिखरावर असूनही तितकेच मातीशी पाय घट्ट रोवलेले उद्योगपती म्हणजे रतन टाटा, रतन टाटांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या साधेपणाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इंन्स्टाग्रामवर रतन टाटांनी केलेल्या पोस्टला हजारोने लाइक्स आणि लाखो लोकांनी पाहिला आहे. 

ही एक जाहीरात आहे ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा वर्गात कविता वाचनाचा कार्यक्रमात भाग घेतो, सर्व मित्र आणि पालक त्याच्यासमोर बसलेले असतात त्यांच्यासमोर उभा राहिलेला हा विद्यार्थी आपल्या कवितेची सुरुवात करतो, यात मेरा बाबा देश चलाता है या वाक्यापासून कवितेची सुरुवात होते. उपस्थित पालक, शिक्षक एकमेकांकडे पाहत बसतात. 

त्यापुढे जाऊन तो मुलगा सांगतो की, माझे बाबा राजकीय नेते नाही, डॉक्टरही नाहीत, पोलीस नाहीत की आर्मीत नाही पण त्यांनी काम केलं नाही तर देश थांबेल, जर माझे बाबा कामाला गेले नाहीत तर देशातील प्रत्येक घर थांबेल, मुलं शाळेत जाणार नाही, मंत्री मंत्रालयात जाणार नाही कारण माझे बाबा असं काम करतात जे कोणीच करणार नाही. 

View this post on Instagram

In Mumbai, a city of 23 million, only 50,000 individuals are employed as sanitation workers. They are working in difficult conditions every single day to tackle the enormous amount of waste that Mumbai generates. As a @tata_trusts initiative, Mission Garima is working to provide safe, hygienic and humane working conditions for sanitation workers who are severely affected doing the unimaginable for the city so that we may find it clean! #TwoBinsLifeWins is a campaign urging citizens to segregate their biodegradable and non-biodegradable waste to help reduce the burden on these hardworking men and women. The links below will help you dispose of your waste responsibly and support our initiative. After all, this country is run by each one of us. https://www.tatatrusts.org/ #TwoBinsLifeWins

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

एका सफाई कामगाराच्या मुलाने वाचलेली ही कविता सर्वांच्या ह्दयाला स्पर्श करते, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नाल्यात, गटारात जीव धोक्यात घालून तो साफसफाई करत असतो, त्याच्या कामामुळे रोग दूर राहतात, किटाणूंपासून संरक्षण मिळतं. देश सुका आणि ओला कचरा वेगळा करत नाही, माझे बाबा त्या कचऱ्यात उतरतात आणि आजारी पडतात, कधी कधी वाटतं माझे बाबा आजाराला हरतील, घरी परतणार नाही, त्यामुळे माझ्या बाबांना वाचवा अशा प्रकारची जाहीरात रतन टाटांनी शेअर केली आहे. टाटा ट्रस्टअंतर्गत 'मिशन गरीमा' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सफाई कामगारांच्या कामात कमी होण्यासाठी नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखावी असं सांगण्यात आलं आहे. 

याबाबत रतन टाटांनी सांगितले की, मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. अनेक धोकादायक स्थितीत त्यांचे काम सुरु असतं. मिशन गरीमा अशा लोकांसाठी सुरक्षा, आरोग्यदायी आणि मानवी काम करण्याची परिस्थिती बदलेल, जेणेकरून त्यांना स्वच्छ वाटेल असं त्यांनी म्हटलं. तसेच सफाई कामगारांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी लोकांनीही कचऱ्याचं वर्गीकरण करायला हवं असं आवाहन केलं आहे.  

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMumbaiमुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्नInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी