शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

'माझे बाबा जे काम करतात ते कोणीच करणार नाही'; रतन टाटांनी शेअर केली 'त्या' मुलाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 16:24 IST

Ratan Tata Shared Emotional Story To Provide Help To Sanitation Workers | मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात

मुंबई - श्रीमंतीच्या शिखरावर असूनही तितकेच मातीशी पाय घट्ट रोवलेले उद्योगपती म्हणजे रतन टाटा, रतन टाटांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या साधेपणाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इंन्स्टाग्रामवर रतन टाटांनी केलेल्या पोस्टला हजारोने लाइक्स आणि लाखो लोकांनी पाहिला आहे. 

ही एक जाहीरात आहे ज्यामध्ये एक शाळकरी मुलगा वर्गात कविता वाचनाचा कार्यक्रमात भाग घेतो, सर्व मित्र आणि पालक त्याच्यासमोर बसलेले असतात त्यांच्यासमोर उभा राहिलेला हा विद्यार्थी आपल्या कवितेची सुरुवात करतो, यात मेरा बाबा देश चलाता है या वाक्यापासून कवितेची सुरुवात होते. उपस्थित पालक, शिक्षक एकमेकांकडे पाहत बसतात. 

त्यापुढे जाऊन तो मुलगा सांगतो की, माझे बाबा राजकीय नेते नाही, डॉक्टरही नाहीत, पोलीस नाहीत की आर्मीत नाही पण त्यांनी काम केलं नाही तर देश थांबेल, जर माझे बाबा कामाला गेले नाहीत तर देशातील प्रत्येक घर थांबेल, मुलं शाळेत जाणार नाही, मंत्री मंत्रालयात जाणार नाही कारण माझे बाबा असं काम करतात जे कोणीच करणार नाही. 

View this post on Instagram

In Mumbai, a city of 23 million, only 50,000 individuals are employed as sanitation workers. They are working in difficult conditions every single day to tackle the enormous amount of waste that Mumbai generates. As a @tata_trusts initiative, Mission Garima is working to provide safe, hygienic and humane working conditions for sanitation workers who are severely affected doing the unimaginable for the city so that we may find it clean! #TwoBinsLifeWins is a campaign urging citizens to segregate their biodegradable and non-biodegradable waste to help reduce the burden on these hardworking men and women. The links below will help you dispose of your waste responsibly and support our initiative. After all, this country is run by each one of us. https://www.tatatrusts.org/ #TwoBinsLifeWins

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

एका सफाई कामगाराच्या मुलाने वाचलेली ही कविता सर्वांच्या ह्दयाला स्पर्श करते, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नाल्यात, गटारात जीव धोक्यात घालून तो साफसफाई करत असतो, त्याच्या कामामुळे रोग दूर राहतात, किटाणूंपासून संरक्षण मिळतं. देश सुका आणि ओला कचरा वेगळा करत नाही, माझे बाबा त्या कचऱ्यात उतरतात आणि आजारी पडतात, कधी कधी वाटतं माझे बाबा आजाराला हरतील, घरी परतणार नाही, त्यामुळे माझ्या बाबांना वाचवा अशा प्रकारची जाहीरात रतन टाटांनी शेअर केली आहे. टाटा ट्रस्टअंतर्गत 'मिशन गरीमा' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सफाई कामगारांच्या कामात कमी होण्यासाठी नागरिकांनाही आपली जबाबदारी ओळखावी असं सांगण्यात आलं आहे. 

याबाबत रतन टाटांनी सांगितले की, मुंबईत जवळपास सव्वादोन कोटी लोकसंख्या आहे, फक्त ५० हजार सफाई कामगार मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. अनेक धोकादायक स्थितीत त्यांचे काम सुरु असतं. मिशन गरीमा अशा लोकांसाठी सुरक्षा, आरोग्यदायी आणि मानवी काम करण्याची परिस्थिती बदलेल, जेणेकरून त्यांना स्वच्छ वाटेल असं त्यांनी म्हटलं. तसेच सफाई कामगारांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी लोकांनीही कचऱ्याचं वर्गीकरण करायला हवं असं आवाहन केलं आहे.  

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMumbaiमुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्नInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी