शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

"महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर…’’ अजित पवारांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:54 IST

Ajit Pawar Criticize CM Eknath Shinde: पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई - शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ४० आमदारांसह भाजपाचा पाठिंबा घेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मुख्यंमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया खोळंबली असून, पुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत फिरत आहेत. रात्री दहानंतरही सभा घेताहेत, मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील तर ती बाब बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारचा कारभार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज घणाघाती टीका केली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं पहिलं प्राधान्य हे जनतेचे, पुरग्रस्तांचे प्रश्न सोडवायला असलं पाहिजे. मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारण्याला दुसरं प्राधान्य असलं पाहिजे.राज्यातील शेतकरी पुरामुळे संकटात असताना त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात हे संवेदनशून्यतेचं उदाहरण आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

सध्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत.  कुठले कार्यक्रम घ्यायचे हा  मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पण  रात्री १० वाजल्यानंतर मुख्यमंत्री असो वा कुणी व्यक्ती असो माईक बंद करायचा असतो. आम्हीही कधीकाळी उपमुख्यमंत्री होतो. तो नियम सगळ्यांना आहे. तो नियम सुप्रिम कोर्टाने काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. पण हा नियम  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुणीही पाळताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील. तर तिथले सीपी, तिथले एसपी करणार काय?  एसपींना, सीपींना आदेश देणारेच जर नियम मोडायला लागले, कायदे मोडायला लागले, घटना पायदळी तुडवायला लागले तर ही बाब बरोबर नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कुणी पाहिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला आवर घातला पाहिजे. उत्साही कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे. १० वाजलेत आता आपण नियमांचं पालन केलं पाहिजे, असं सांगितलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. ठिक आहे उत्साह असतो. मात्र दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असं काही झालेलं दिसलं नसल्याचंही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांचे दहाच्या नंतर कार्यक्रम सुरू असलेले, किंवा लाऊस स्पीकर सुरू असलेला मी पाहिलं नाही. त्यामुळे मी त्याबाबत काही बोलणार नाही. पण एकंदरीत मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालं आहे. सध्या मुख्यमंत्री इतर व्यापात अडकलेले असल्याने ते इतर ठिकाण फिरताहेत, इतर मान्यवरांच्या भेटीगाठी घेताहेत, दर्शन घेताहेत. त्यांनी कुणाचं दर्शन घ्यावं याबाबत मला काही बोलायचं नाही, असेही अजित पवार म्हणाले.     

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार