शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

समान नागरी कायदा नको - मुस्लीम कायदा मंडळ प्रतिनिधींची मागणी

By admin | Updated: February 18, 2017 21:17 IST

समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  सध्याचे केंद्र सरकार व काही प्रसारमाध्यमे समान नागरी कायद्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसलमान महिला त्यांच्या खासगी कायद्याबाबत समाधानी असून त्यांना समान नागरी कायद्याअंतर्गत आणू नये. समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. महिलांची तस्करी, बलात्कार, खून, लैंगिक अत्याचाराविरोधात आदी आवाज उठवावा, असे मत अखिल भारतीय मुस्लीम कायदा मंडळाच्या सदस्य फकिरा अतीक यांनी व्यक्त केले. शनिवारी गोवा स्टडी ग्रुप व गोवा इंटरनॅशनल सेंटरतर्फे दोनापावल येथे आयोजिलेल्या समान नागरी कायद्यावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो उपस्थित होते. तसेच माजी अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. मनोहर उसगावकर व व्ही.एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य एम.आर.के. प्रसाद व्यासपीठावर उपस्थित होते. अतीक यांनी सांगितले की, खाजगी कायद्याअंतर्गत सर्व अधिकार मिळत असून समान नागरी कायद्याची सक्ती केली तर सामाजिक रचनेला अडथळा येईल. आमचे देव व देवाला पूजनाच्या पध्दती वेगवेगळ्या आहेत तर कुटुंबाचे कायदे समान कसे असतील. मुस्लीम खासगी कायदे हे घटनात्मक अधिकार असून कुणालाच त्यात बदल करण्याचा अधिकार नाही. सध्याची स्थीती पाहिली तर टीव्ही चॅनल्स हा मुद्दा घेऊन ढोंगीपणा करतात. असे झाले तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल. समान नागरी कायदा ही संकल्पना पाश्चात्य संस्कृतीतून आली आहे. हिंदू खासगी कायद्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही तेव्हा मुस्लीम खासगी कायद्याकडेच हस्तक्षेप का करत आहे, असा प्रश्न त्यांनी केला. प्रसारमाध्यमांनी मुस्लीम महिला कोणत्या तरी दबावाखाली असल्याचे चित्र उभे केले आहे ते योग्य नव्हे. चुकीच्या पद्धतीने चॅनल्सवर हा प्रश्न मांडण्यात येत असून त्याद्वारे वाईट संदेश जात आहे. इस्लाममध्ये महिला व पुरुषांना समान अधिकार आहेत. तसेच मुस्लीम समाजात घटस्फोटांचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे त्या म्हणाल्या. मुस्लीम महिलांवर सध्याचे सरकार समान नागरी कायदा स्वीकारण्यासाठी दबाव आणू शकत नाही, असे मत अतीक यांनी व्यक्त केले. गोव्यात समान नागरी कायद्यामुळे लग्नाची नोंदणी करणे सक्तीचे असून हा कायदा योग्य असल्याचे अ‍ॅड. उजगावकर म्हणाले. नोंदणी झाली की महिलांना सोडून देण्याचे भय राहत नाही. नोंदणी न झाल्याने पत्नीला सोडून देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तेव्हा कायदेशीर कागदपत्रे असलेली बरी. देशातील विविध धर्मांमध्ये महिलांवर चालणारे अत्याचार अगोदर थांबविले पाहिजेत. तसेच महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत. आदर्श समान नागरी कायदा करून तो लोकांसाठी खुला करून त्यावर चर्चा व्हावी नंतरच त्याची अंमलबजावणी करावी, असे मत डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केले. समान नागरी कायदा अमलात आणला तर ते एका दृष्टीने चांगलेच ठरणार, असे एदुआर्द फालेरो यांनी सांगितले. गोव्यात हा कायदा पोर्तुगीज काळापासून अमलात असून यात मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन धर्म या कायद्याचे पालन करतात. या विषयावर सरकारने सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेली खास करून मुसलमान समाजातील न्यायाधीश, धर्माचे तज्ज्ञ, मुसलमान महिला प्रतिनिधी यांची सल्लागार समिती स्थापन करावी व नंतरच मसुदा तयार करून तो संसदेत मांडण्यात यावा, असे फालेरो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)