शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक ‘महाभरती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:12 IST

शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही : विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता...

ठळक मुद्देविविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्तीरिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घ्यावी, या मागणीसाठी सुमारे ६५ मोर्चे काढले. या पोर्टलवरून चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊन त्याबाबतचे सबळ पुरावे सादर केले. मात्र, महापोर्टलद्वारे सुरू असलेली अपारदर्शक ‘महाभरती’ थांबविण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, महाराष्ट्र गृहनिर्माण विभागातील पदे तसेच आरोग्यसेवक, कृषीसेवक, पुरवठा निरीक्षक, तलाठी, लिपिक आदी पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली जाते. मात्र, बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. राज्यात आत्तापर्यंत ६५ मोर्चे निघाले आहेत. परंतु, या मोर्चांची शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. विविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्ती होत असूनही शासन गप्प का? असा सवाल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.अमरावती व बुलडाणा या जिल्ह्यातील ठरावीक परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची काही पदांवर नियुक्ती झाली आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींची निवड केली आहे. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना असलेल्या गुणांपेक्षा अधिक गुण असूनही काही विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली गेली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाता येते. परीक्षेचे सुपरव्हिजन महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना करतात. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शकपणे होत नाही. एमएससीआयटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल तात्काळ मिळतो. त्यानुसार महापरीक्षा पोर्टलवरून परीक्षेचा निकाल दिला जात नाही. या उलट विद्यार्थ्यांचे रिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे........इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या...पेसा क्षेत्रातील गावांमधील तलाठी भरतीसाठी अनुसूचित क्षेत्रातील व अनुसूचिती जमातीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनुसूचित जमातीमधील उमेदवाराला डावलून इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या आहेत, याचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.........महापोर्टलवरून गुणवत्ता डावलून नियुक्ती दिली जाते. विद्यार्थ्यांची उत्तरे परीक्षा झाल्यानंतर बदलली जातात. अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे महापोर्टलवरून अपात्र मुलांना नियुक्ती दिल्याचे दिसून येते.- रविराज राठोड, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी.........राज्यातील काही निवडक परीक्षा केंद्रातील २० ते २२ विद्यार्थी नियुक्त होत असल्याची माहिती आम्ही जमा केली आहे. तसेच एका परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार त्याच दिवशी महापरीक्षा पोर्टलला ई-मेलवरून पाठविण्यात आली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. उलट संबंधित केंद्रातील मुलांची नावे गुणवत्ता यादीत प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती दिली गली. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील विशिष्ट केंद्रावर परीक्षा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी जात आहेत. ही बाब विचार करण्यासारखी आहे.- राहुल कविटकर, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी........महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाºया परीक्षेचा दर्जा ढासळलेला आहे. द्वितीय श्रेणी पदाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?, शाहरूख खानच्या पत्नीचे नाव काय?, काखेत कळसा अन् गावाला......? देशाच्या पंतप्रधानांचे नाव काय? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यातही परीक्षेत पारदर्शकता राखली जात नाही. तसेच पेसा क्षेत्रासाठी तलाठी भरती करताना स्वतंत्र विचार केला जात नाही. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक पद्धतीने महाभरती सुरू असल्याचे दिसून येते.- महेश बढे, स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीonlineऑनलाइनGovernmentसरकार