शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक ‘महाभरती’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:12 IST

शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही : विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता...

ठळक मुद्देविविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्तीरिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घ्यावी, या मागणीसाठी सुमारे ६५ मोर्चे काढले. या पोर्टलवरून चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊन त्याबाबतचे सबळ पुरावे सादर केले. मात्र, महापोर्टलद्वारे सुरू असलेली अपारदर्शक ‘महाभरती’ थांबविण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, महाराष्ट्र गृहनिर्माण विभागातील पदे तसेच आरोग्यसेवक, कृषीसेवक, पुरवठा निरीक्षक, तलाठी, लिपिक आदी पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली जाते. मात्र, बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. राज्यात आत्तापर्यंत ६५ मोर्चे निघाले आहेत. परंतु, या मोर्चांची शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. विविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्ती होत असूनही शासन गप्प का? असा सवाल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.अमरावती व बुलडाणा या जिल्ह्यातील ठरावीक परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची काही पदांवर नियुक्ती झाली आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींची निवड केली आहे. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना असलेल्या गुणांपेक्षा अधिक गुण असूनही काही विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली गेली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाता येते. परीक्षेचे सुपरव्हिजन महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना करतात. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शकपणे होत नाही. एमएससीआयटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल तात्काळ मिळतो. त्यानुसार महापरीक्षा पोर्टलवरून परीक्षेचा निकाल दिला जात नाही. या उलट विद्यार्थ्यांचे रिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे........इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या...पेसा क्षेत्रातील गावांमधील तलाठी भरतीसाठी अनुसूचित क्षेत्रातील व अनुसूचिती जमातीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनुसूचित जमातीमधील उमेदवाराला डावलून इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या आहेत, याचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.........महापोर्टलवरून गुणवत्ता डावलून नियुक्ती दिली जाते. विद्यार्थ्यांची उत्तरे परीक्षा झाल्यानंतर बदलली जातात. अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे महापोर्टलवरून अपात्र मुलांना नियुक्ती दिल्याचे दिसून येते.- रविराज राठोड, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी.........राज्यातील काही निवडक परीक्षा केंद्रातील २० ते २२ विद्यार्थी नियुक्त होत असल्याची माहिती आम्ही जमा केली आहे. तसेच एका परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार त्याच दिवशी महापरीक्षा पोर्टलला ई-मेलवरून पाठविण्यात आली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. उलट संबंधित केंद्रातील मुलांची नावे गुणवत्ता यादीत प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती दिली गली. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील विशिष्ट केंद्रावर परीक्षा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी जात आहेत. ही बाब विचार करण्यासारखी आहे.- राहुल कविटकर, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी........महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाºया परीक्षेचा दर्जा ढासळलेला आहे. द्वितीय श्रेणी पदाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?, शाहरूख खानच्या पत्नीचे नाव काय?, काखेत कळसा अन् गावाला......? देशाच्या पंतप्रधानांचे नाव काय? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यातही परीक्षेत पारदर्शकता राखली जात नाही. तसेच पेसा क्षेत्रासाठी तलाठी भरती करताना स्वतंत्र विचार केला जात नाही. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक पद्धतीने महाभरती सुरू असल्याचे दिसून येते.- महेश बढे, स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीonlineऑनलाइनGovernmentसरकार