शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Nitin Gadkari: माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव; माजी खासदार दत्ता मेघेंनी गुपित केलं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:06 IST

माझे सर्व पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कुटुंबातील महत्त्वाचे नेते आहेत असं दत्ता मेघे म्हणाले.

ठळक मुद्देएरव्ही राजकारणात नेहमी एकमेकांवर टीकेचे बाण चालवणारे नेते, पक्षांतर करणारे नेते यावर अजिबात विश्वास ठेवला जात नाहीमेघेंनी स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं नाव घेण्याऐवजी नितीन गडकरींचे नाव का घेतले असावे? मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये यासाठी त्यांचे नाव दिलं आहे

वर्धा – अनेकदा राजकारणात कुणीही कुणाचं कायमच शत्रू नसतं तर कुणीही मित्र नसतं. राजकारणात चढउतार पाहायला मिळतात. परंतु राजकारणात काही नेते असे आहेत जे सर्व नेत्यांची जुळवून घेतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. काही मोजकेच नेते आहेत ज्यांच्याबाबत हे उदाहरण लागू पडतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्याबाबत असाच काहीचा प्रकार वर्धा येथे ऐकायला मिळाला.

माजी खासदार दत्ता मेघे(Datta Meghe) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. मृत्यूपत्रात कुठलाही घोळ होऊ नये यासाठी माझ्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin GadkarI) यांचे नाव लिहिल्याचा गौप्यस्फोट मेघे यांनी जाहीरपणे केला. नगरपालिकेच्या विकासकामांचे ई भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात मेघे यांनी ही गोष्ट उघड केल्याने अनेकांसाठी तो चर्चेचा विषय बनला आहे.

काय म्हणाले दत्ता मेघे?

माझे सर्व पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कुटुंबातील महत्त्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये यासाठी त्यांचे नाव दिलं आहे. एका राजकारण्यानं ज्या पक्षात स्वत:ची हयात घालवली त्या पक्षातील अथवा स्वत:च्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचं मृत्यूपत्रात नाव नाही परंतु ज्या पक्षात नव्याने सहभागी झालो तेथील नेत्याचे नाव घेतलं ही आश्चर्याची गोष्ट आहे. दत्ता मेघेंनी मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव का आणि कशासाठी लिहिले आहे? याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. मात्र मेघेंच्या या विधानानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

एरव्ही राजकारणात नेहमी एकमेकांवर टीकेचे बाण चालवणारे नेते, पक्षांतर करणारे नेते यावर अजिबात विश्वास ठेवला जात नाही. राजकारणात कधीही काहीही घडू शकते परंतु मृत्यूपत्रात एखाद्या नेत्याचं नाव लिहिण्याइतपत राजकीय नेत्यांचा एकमेकांवर विश्वास असतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. मेघेंनी स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं नाव घेण्याऐवजी नितीन गडकरींचे नाव का घेतले असावे? नितीन गडकरींवर मेघेंना इतका विश्वास का? अशी चर्चाही लोकांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे. दत्ता मेघे ४ वेळा काँग्रेसमधून लोकसभेत निवडून गेले होते तर एकदा राज्यसभेवर काँग्रेसनं त्यांची वर्णी लावली होती. राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर दत्ता मेघेंनी भाजपात प्रवेश केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDatta Megheदत्ता मेघे