शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

प्रांतीय, भाषिक राजकारण करायचं नाही, पण...; मुंबई-पुण्यातील लोकसंख्येबाबत गडकरींची मोठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 14:08 IST

मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही.

ठळक मुद्देमुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे - गडकरीगडकरी यांनी , उद्योग, व्यापर, शेती आणि पर्यावरण, आदी क्षेत्रांसदर्भातही भाष्य केलेमुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही

मुंबई : कोरोनाचे संकट संपल्यानंतर, भविष्यात मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. मला प्रांतीय आणि भाषिक राजकारण करायचे नाही. मात्र, मुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट करण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोनाचं संकट किती गंभीर आहे, हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे   #e_conclave मध्ये बोलत होते. 

गडकरी यांनी यावेळी, उद्योग, व्यापर, शेती आणि पर्यावरण, आदी क्षेत्रांसदर्भातही भाष्य केले. भविष्यात महाराष्ट्रासाठी व्यापाराच्या क्षेत्रात कोणकोणत्या वेगळ्या संधी आहेत, याचाही सविस्तर उहापोह केला. तसेच भविष्यात समुद्र आणि नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. तरच पर्यटनासाठी बाहेरून लोक महाराष्ट्रात येतील. सध्याचा काळ हा कठीण आहे. मात्र, महाराष्ट्राकडे एक राज्य म्हणून खूप क्षमता आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल, असेही गडकरी म्हणाले.

महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. भविष्यात राज्यातील वाहने ही एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉलमिश्रीत पेट्रोलवर चालवण्यात यावीत. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी  होईल. तसेच वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचेल, असे गडकरी म्हणाले. या वेळी त्यांनी शेती आणि इतर क्षेत्रांवरही भाष्य केले. महाराष्ट्राने शेती आणि इतर क्षेत्रांतही अभिनव उपाययोजना करायला हव्यात, असेही ते म्हणाले.

मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही -मी दिल्लीत असलो असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येत आहे. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. कदाचित राज्याबाहेर आल्यावरच मराठी संस्कृतीचे मोठेपण समजते, अशी भावनाही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5,00000च्या पुढे, महाराष्ट्राची स्थिती सर्वात गंभीर

Good news: लवकरच संपणार कोरोनाचा कहर?; "वर्षभरात येऊ शकते कोरोना व्हॅक्सीन"

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरdelhiदिल्लीBJPभाजपाministerमंत्री