शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Nitesh Rane: "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…", नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:06 IST

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटमधून राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यातील सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पाठोपाठ झालेल्या ठाणे आणि औरंगाबाद सभेतही राज ठाकरे यांनी हाच मुद्दा लावून धरत महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले असताना भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या वादात उडी घेतली आहे. राणेंनी केलेल्या ट्विटची सध्या चर्चा सुरू झाली आहे. 

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतची मुदत दिली होती. यानंतरही कारवाई झाली नाही, तर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. दरम्यान, आज राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये भोंग्याशिवाय अजान देण्यात आली. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी तीन ट्वीट केले असून त्यामधून भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर देखील निशाणा साधताना रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?आपल्या ट्विटमध्ये नितेश राणेंनी रझा अकादमी आणि पीएफआयला लक्ष्य केलं आहे. "लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही. खरी समस्या समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणे हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. तेव्हाच शांतता प्रस्थापित होईल", असं ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

राज्य सरकारवर निशाणाते पुढे म्हणतात, "रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. अर्थात त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरीदेखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसं कळणार? त्यांचे सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवं." 

ते पुढे म्हणतात, "एक सच्चा मुसलमान कधीही त्याच्या देशाविरुद्ध किंवा राज्याविरुद्ध जाणार नाही. मुस्लीम समाज हिंदू किंवा इतर कोणत्याही समाजासारखंच आपल्या मायभूमीवर प्रेम करतात. पण रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनाच द्वेष आणि भेदभाव पसरवततात. अमरावती, नांदेडमधील दंगली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आली आहे", असंही नितेश राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे