शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:54 IST

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गायकवाड यांनी मंगळवारी विभागाच्या व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि परीक्षांचे नियोजन कसे करता येईल, याची चाचपणी केली. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात परीक्षेविना प्रवेश द्यावा, याबाबत आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कल होता, असे सूत्रांनी सांगितले.इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनापरीक्षा पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसाच निर्णय इयत्ता नववी आणि अकरावीबाबतही घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते, यामुळे अभ्याक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही, तसेच नववीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन त्यातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करताना, त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल, त्यासाठीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दहावी परीक्षा ऑफलाइनचराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले, तर ऐनवेळी काही बदल करण्याचा विषय आला तर त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVarsha Gaikwadवर्षा गायकवाड