शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:54 IST

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गायकवाड यांनी मंगळवारी विभागाच्या व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि परीक्षांचे नियोजन कसे करता येईल, याची चाचपणी केली. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात परीक्षेविना प्रवेश द्यावा, याबाबत आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कल होता, असे सूत्रांनी सांगितले.इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनापरीक्षा पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसाच निर्णय इयत्ता नववी आणि अकरावीबाबतही घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते, यामुळे अभ्याक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही, तसेच नववीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन त्यातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करताना, त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल, त्यासाठीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दहावी परीक्षा ऑफलाइनचराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले, तर ऐनवेळी काही बदल करण्याचा विषय आला तर त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVarsha Gaikwadवर्षा गायकवाड