शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:54 IST

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गायकवाड यांनी मंगळवारी विभागाच्या व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि परीक्षांचे नियोजन कसे करता येईल, याची चाचपणी केली. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात परीक्षेविना प्रवेश द्यावा, याबाबत आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कल होता, असे सूत्रांनी सांगितले.इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनापरीक्षा पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसाच निर्णय इयत्ता नववी आणि अकरावीबाबतही घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते, यामुळे अभ्याक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही, तसेच नववीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन त्यातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करताना, त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल, त्यासाठीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दहावी परीक्षा ऑफलाइनचराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले, तर ऐनवेळी काही बदल करण्याचा विषय आला तर त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVarsha Gaikwadवर्षा गायकवाड