शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत; निलेश राणेंची टीका

By देवेश फडके | Updated: February 2, 2021 19:17 IST

भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देभाजप नेते निलेश राणे यांची शिवसेना खासदार संजय राऊतांवर जोरदार टीकाशेतकरी आंदोलकांची घेतली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेटसंजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचा निलेश राणे यांचा आरोप

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. शिवसेना खासदारांच्या एका शिष्टमंडळाने आज (मंगळवारी) दुपारी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचाही सहभाग होता. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी यासंदर्भात जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.

निलेश राणे यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधी गेले नाहीत. महाराष्ट्रातील आंदोलक नको फक्त महाराष्ट्र हे नाव राजकारण करण्यासाठी पाहिजे. संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. 

शिवसेनेचे शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना नेत्यांनी गाझीपूर सीमेवरून जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी टिकेत यांना यावेळी बोलताना सांगितले. 

शिवसेना नेते दिल्लीच्या सीमेवर पोहोचले; शेतकरी नेते टिकैत भेटीबद्दल स्पष्टच बोलले

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला.  आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचे शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता, तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारने त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतेही राजकारण येऊ देऊ नये, असे संजय राऊत म्हणाले. 

सरकार अन्याय, दहशत करतेय

ज्याप्रकारे सरकारकडून अन्याय, दहशत केली जात आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, पाठबळ देणे आपले कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहेत. देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे. राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरून बोललो होतो. पण प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणे हे महत्वाचे आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला, असे संजय राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीagitationआंदोलन