शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 16:56 IST

मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या.

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे प्लॉट अंतिम झाले आहेत. तर प्लॉटची मोजणी सुद्धा झाली असून पुढील आठवड्यात प्लॉट वाटप करणार असल्याची माहिती गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मिरगणे म्हणाले की, या आधी सुद्धा अनेकदा राज्यावर नैसर्गिक संकट आले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये ज्या वेगाने पुनर्वसनाचे काम सुरु आहेत, ते याआधी कधीच झाले नसावेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मी आणि प्रशासनाचे अधिकारी लगेच कामाला लागलो. आणि आज हे काम अंतिम टप्यात आहे.

यासाठी आम्ही सांगलीमधील सर्वात जास्त पुराचा फटका बसलेल्या भिलवडी आणि भ्रमनाळ हे गाव आधी निवडले. या गावातील मोजणी पूर्ण झाली असून प्लॉट सुद्धा निश्चित झाले आहेत. तसेच पुढील आठवड्यात या गावतील पूरग्रस्तांना प्लॉटचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी आम्हाला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र आम्ही हे दोन महिन्यातच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा सुद्धा मिरगणे यांनी यावेळी केला.

आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पूर आले आहेत. त्याठिकाणी आरोग्याचा मोठा सामना प्रशासनाला करावा लागला असल्याचे आपण पहिले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये आम्ही हे होऊ दिले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जलदगतीने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने या भागात रोगराईचा प्रश्न निर्माण झाला नाही, असेही मिरगणे म्हणाले.

पूरग्रस्तांमध्ये आमच्याबद्दल रोष नाहीच.

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचा फटका तुम्हाला बसणार असल्याचा दावा होता असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना मिरगणे म्हणाले की, मला वाटत आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले आहेत. सांगली-कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पूरग्रस्तांसाठी धावून गेलो आहेत, त्याने लोकांमध्ये आमच्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे आमच्याबद्दल लोकांच्या मनात रोष नाही, हे माझे अनुभूव असल्याचे मिरगणे म्हणाले.