शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 16:56 IST

मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या.

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे प्लॉट अंतिम झाले आहेत. तर प्लॉटची मोजणी सुद्धा झाली असून पुढील आठवड्यात प्लॉट वाटप करणार असल्याची माहिती गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मिरगणे म्हणाले की, या आधी सुद्धा अनेकदा राज्यावर नैसर्गिक संकट आले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये ज्या वेगाने पुनर्वसनाचे काम सुरु आहेत, ते याआधी कधीच झाले नसावेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मी आणि प्रशासनाचे अधिकारी लगेच कामाला लागलो. आणि आज हे काम अंतिम टप्यात आहे.

यासाठी आम्ही सांगलीमधील सर्वात जास्त पुराचा फटका बसलेल्या भिलवडी आणि भ्रमनाळ हे गाव आधी निवडले. या गावातील मोजणी पूर्ण झाली असून प्लॉट सुद्धा निश्चित झाले आहेत. तसेच पुढील आठवड्यात या गावतील पूरग्रस्तांना प्लॉटचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी आम्हाला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र आम्ही हे दोन महिन्यातच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा सुद्धा मिरगणे यांनी यावेळी केला.

आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पूर आले आहेत. त्याठिकाणी आरोग्याचा मोठा सामना प्रशासनाला करावा लागला असल्याचे आपण पहिले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये आम्ही हे होऊ दिले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जलदगतीने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने या भागात रोगराईचा प्रश्न निर्माण झाला नाही, असेही मिरगणे म्हणाले.

पूरग्रस्तांमध्ये आमच्याबद्दल रोष नाहीच.

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचा फटका तुम्हाला बसणार असल्याचा दावा होता असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना मिरगणे म्हणाले की, मला वाटत आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले आहेत. सांगली-कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पूरग्रस्तांसाठी धावून गेलो आहेत, त्याने लोकांमध्ये आमच्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे आमच्याबद्दल लोकांच्या मनात रोष नाही, हे माझे अनुभूव असल्याचे मिरगणे म्हणाले.