शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

पुढच्या आठवड्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करणार: राजेंद्र मिरगणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 16:56 IST

मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या.

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे प्लॉट अंतिम झाले आहेत. तर प्लॉटची मोजणी सुद्धा झाली असून पुढील आठवड्यात प्लॉट वाटप करणार असल्याची माहिती गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मिरगणे म्हणाले की, या आधी सुद्धा अनेकदा राज्यावर नैसर्गिक संकट आले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये ज्या वेगाने पुनर्वसनाचे काम सुरु आहेत, ते याआधी कधीच झाले नसावेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मी आणि प्रशासनाचे अधिकारी लगेच कामाला लागलो. आणि आज हे काम अंतिम टप्यात आहे.

यासाठी आम्ही सांगलीमधील सर्वात जास्त पुराचा फटका बसलेल्या भिलवडी आणि भ्रमनाळ हे गाव आधी निवडले. या गावातील मोजणी पूर्ण झाली असून प्लॉट सुद्धा निश्चित झाले आहेत. तसेच पुढील आठवड्यात या गावतील पूरग्रस्तांना प्लॉटचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी आम्हाला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र आम्ही हे दोन महिन्यातच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा सुद्धा मिरगणे यांनी यावेळी केला.

आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पूर आले आहेत. त्याठिकाणी आरोग्याचा मोठा सामना प्रशासनाला करावा लागला असल्याचे आपण पहिले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये आम्ही हे होऊ दिले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जलदगतीने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने या भागात रोगराईचा प्रश्न निर्माण झाला नाही, असेही मिरगणे म्हणाले.

पूरग्रस्तांमध्ये आमच्याबद्दल रोष नाहीच.

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचा फटका तुम्हाला बसणार असल्याचा दावा होता असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना मिरगणे म्हणाले की, मला वाटत आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले आहेत. सांगली-कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पूरग्रस्तांसाठी धावून गेलो आहेत, त्याने लोकांमध्ये आमच्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे आमच्याबद्दल लोकांच्या मनात रोष नाही, हे माझे अनुभूव असल्याचे मिरगणे म्हणाले.