शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करू, सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 16:10 IST

मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते भाविकांसाठी खुलं केलं जाईल, असंही स्वामी म्हणाले आहेत.मंदिराच्या निर्माणासाठी लागणारी आवश्यक सामग्रीही तयार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार असेल, राम मंदिराला मग स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडणे बाकी राहील,’ असेही स्वामींनी स्पष्ट केलं आहे. राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी नव्या कायद्याची आवश्यकता नाही. आम्ही राम मंदिरासाठी नवा कायदा करू शकतो. परंतु आम्हाला त्याची सर्व गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आम्ही हा खटला नक्कीच जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, असंही स्वामी म्हणाले आहेत.अलाहाबाद उच्च न्यायालयात या विषयावर पूर्वीच खूप सखोल चर्चा झाली आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाकडे राम मंदिर पुनर्निर्माणात आडकाठी आणण्याचं म्हणावं तसं कारण आता राहिलं नाही. अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला 6 डिसेंबर 2017ला 25 वर्षं पूर्ण होत असून, त्याच पार्श्वभूमीवर स्वामींच्या विधानाला राजकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झालं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी केले होते.विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत हिंदू धर्मातील संत तसेच मठप्रमुख, साधू अशा सुमारे दोन हजार जणांपुढे बोलताना भागवत म्हणाले की, अयोध्येत जे दगड आणण्यात आले आहेत, त्यातूनच आपल्याला राम मंदिर उभारायचे आहे. ते मंदिर उभारले जाईल आणि त्यावर भगवा फडकेल, असा दिवस जवळ आला आहे. अनेक वर्षांची तपश्चर्या, प्रयत्न आणि त्याग या सा-यांमुळेच राम मंदिर उभारणे आता शक्य होत आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे राम मंदिरासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी बोलून दाखवले होते.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीRam Mandirराम मंदिरBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवत